152. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारतासाठी मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या सरी अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाने जमीन पुरेशी भिजण्यास मदत होते. तद्नंतर 'शेतकरी' आपल्या शेत-पेरणीला सुरुवात करतात. हीच "शेती व्यवस्था" समजण्याकरिता लेख क्र. 21/3 काही बदलांसह पुन्हा प्रकाशित करीत आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच इतर साधनांची जुळवा-जुळव करण्यासाठी पुरेसा 'पैका' (पैसा) आवश्यक असतो. सगळी साधनं अन् पाऊस मुबलक असला की शेती चांगली पिकते. शेतकऱ्यांस चांगले उत्पन्न होते. देशात 'मुबलक धान्यपुरवठा' होतो परिणामी अन्न-धान्यांच्या किमती स्थिर राहतात. सर्वसामान्यांना या किमती परवडणाऱ्या असल्याने त्यांचा खान-पानावरील खर्च वाढून त्यांचे 'आरोग्य अन् जीवनस्तर' उंचावतो. शेवटी हेच सक्षम 'अदृश्य हाथ' अर्थव्यवस्थेस गती देऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. 

देशातील शेतकऱ्यांकडे शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या 'किमान पैशाचा कायम तुटवडा' असतो. यामुळे शेतकरी 'कर्जाच्या' माध्यमातून पैसा उभा करतात. कर्जाच्या पैशावर शेती पिकविली जाते. पुरेसा पैसा नसल्याने पिकांच्या गुणवत्तेवर दुर्लक्ष होते. परिणामी 'निकस अन् निकृष्ट अन्न' धान्यांची लागवड होते. सकस अन् चांगल्या दर्जाचे अन्नधान्य स्वतः शेतकऱ्यास आणि सर्वसामान्यांस परवडणारे नसते. यातून अनारोग्य पुढे येते.

यामुळेच 'पैशासाठी शेती' हा विचार भारतातील शेतकऱ्यांनी आता मागे सोडायला हवा. पिकांच्या गुणवत्तेवर लक्ष पुरवायला हवे. शेतकऱ्यांकडे शेती पिकवण्यासाठी पुरेसा पैसा असायला हवा. तसेच कमी खर्चात 'सेंद्रिय शेतीचा (Organic Farming)' पर्याय उपलब्ध करून देण्याची हमी शासनाने घ्यायला हवी. 

शेती क्षेत्राच्या सुधारणेवर वेळीच लक्ष पुरविले नाही,
तर अर्थव्यवस्था अन् आरोग्यव्यवस्था विस्कळीत झाल्यावाचून राहणार नाही..!

~ सचिन विलास बोर्डे

35/4

Monsoon Season | Crops | Farming | Issues of Farmers & Agriculture | Economics | Food Security | Development | Health | Agriculture | Reforms in Agriculture | Farmers | Agriculture Sector | Organic Farming 

Comments

Popular Posts

15. विकासाच्या वाटेवरील भारत!

17. विकासाच्या वाटेवरील भारत!