Posts

Showing posts with the label NOV23

61. विकासाच्या वाटेवरील भारत!

47 ला स्वतंत्र झालेल्या भारताला '26 नोव्हेंबर 1949' रोजी भारतीयांनी निर्मिलेल्या संविधानाने भारताला अन् भारतातील प्रत्येक नागरिकाला ' सार्वभौमत्व' प्राप्त करून दिले. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस चाललेल्या या संविधान निर्मितीच्या प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्याकरिता आणि संविधानाविषयी जनजागृती होण्याकरिता दरवर्षी 26 नोव्हेंबरला "संविधान दिनाचा" दर्जा देण्यात येतो. राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केलेत. हे मूलभूत हक्क सामान्य नागरिकांना कळावे याकरिता अगदी सोप्या भाषेत विश्लेषित केलेली मूलभूत हक्कांची मालिका मी प्रकाशित केली आहे. ( लेख क्रमांक 5/2 ते 9/1 ) हक्कांचा दावा करतेवेळी काही 'कर्तव्य' देखील पार पाडावी लागतात.  ' कलम 51 A अंतर्गत काही मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) निर्देशित केली आहे.' संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे; राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना/अनुसरण करणे; भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता कायम ठेवणे; देशाचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय सेवा बजावणे; धार्मिक...

60. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच आपण 'दिपावली/दिवाळी' हा आतुरतेने वाट पाहिला जाणारा सण मोठ्या आनंदाने साजरा केलाय. त्यातीलच एक दिवस ' बलिप्रतिपदा/भाऊबीज/पाडवा' ई. नावाने साजरा करतात. कित्येक वर्षांपासून 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो' ही प्रचलित म्हण या दिवशी आपल्या कानावर पडत असते. कुठली इडा-पिडा टळावी?, नेमका हा बळी कोण?, त्याच राज्य का यावं? अशी चिकित्सक प्रश्न आपल्याला न पडणं अन् या प्रश्नांची उत्तरे न मिळणं हा गाफीलपणा आपल्या वाट्याला येऊ नये, याकरिता उपरोक्त प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे शोधण्यासाठी सदरील लेख प्रस्तुत करीत आहे. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, सद्गुणी, दानशूर, प्रजाहितदक्ष, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणारा राजा म्हणून बळीराजाला ओळखत. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजाची उपमा दिली जाते. 'थोडक्यात, संपन्न राजाने एक संपन्न राजव्यवस्था स्थापन केली होती.' त्या व्यवस्थेतीलच एक वर्ग बळीराजाच्या विरोधात होता. बळीच्या राज्यावर वर्चस्व मिळविणे अशक्य असल्याने विरोधकांनी छळ-कपटाने बळीराजाला ठार मारून राज्याची सत्ता आपल्या हाती घेतली. प्रजेवर आलेली ही इडा-पिडा होती...

59. विकासाच्या वाटेवरील भारत!

शाळेत शिकलेला 'अश्मयुगीन मानव' आपणास आठवत असेल. जो कंद-मुळे खायचा, दगडाची हत्यारे/साधने वापरायचा. अगदी साधे जीवन जगायचा. हळूहळू त्याच्या बुद्धीत विचारांनी जन्म घेतला. मानवी विवेकाच्या कक्षा रुंदावल्या अन् तंत्रज्ञानाच्या विकासाने गती पकडली. आज या मानवाचे स्वरूप बदललेय. 'हा डिजिटल मानव डिजिटल युगात जगायला लागला.' ऑक्सिजन इतकं महत्व इंटरनेटला मिळालं. काळानुरूप हे तंत्रज्ञान (Technology) अधिकच विकसित होत आहे. यातीलच एक विकसनशील प्रकार म्हणजेच " Artificial Intelligence (AI) ." थोडक्यात मानवाने निर्माण केलेला हा 'यांत्रिक मेंदूच'..! Robotics, Marketing, Gaming, Education, Health Care, National Security, Cyber Security ई. क्षेत्रात AI ने अनेक उल्लेखनीय कामे पार पाडली आहेत. नैतिकतेचा अभाव, बेरोजगारीत वाढ, पक्षपात (Bias) या AI तील त्रुटीही तितक्याच खऱ्या. AI चा तथा Deepfake चा उपयोग करून फोटो किंवा व्हिडिओ चे Morphing अथवा Editing केल्या जाते. थोडक्यात, महिलांच्या फोटो तथा व्हिडिओला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हर्च्युअली विवस्त्र केल्या जातं. प्रसिद्ध...

58. विकासाच्या वाटेवरील भारत!

COVID-19 च्या लसीकरणामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेेय का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कोविड-19 ची लागण असलेल्या 18 ते 45 वयोगटातील निरोगी तरुणांचा आकस्मिकपणे 'हृदयविकाराच्या झटक्याने ' मृत्यू होत आहे. होणारे मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे होत आहे की नाही, हे तपासणारा अभ्यास " भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद " (The Indian Council of Medical Research) ने केलाय. संशोधनानुसार -  झालेले आकस्मिक मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे झालेले नाहीत. याउलट लसीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. हे ठळकपणे ICMR ने नोंदवले आहे.  कोविडची तीव्र (Severe) लागण, धूम्रपान, मद्यपान (Binge Drinking), अतिव्यायाम/शारीरिक श्रम (Intense Physical Activity) या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ICMR ने नमूद केले आहे. दक्षतेबाबत - ज्यांना पूर्वी गंभीर कोविड संसर्ग झालाय त्यांनी एक ते दोन वर्षे जास्त शारीरिक श्रमासह कोणतेही काम करू नये. हा केंद्रीय आरोग्य मंत्रीने दिलेला सल्ला लक्षात घेऊन धूम्रपान, मद्यपान, अतिव्यायाम आपण टाळायला हवा..! ~ सचिन विलास बोर्डे 14/1 The Indian Council of Medical Resea...