Posts

Showing posts with the label FEB24

74. विकासाच्या वाटेवरील भारत!

सध्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या ' भरती प्रक्रिया ' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक शासकीय आणि खाजगी संस्थांच्या मदतीने विविध पदे भरली जात आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी ही पदे मिळविण्याकरिता तयारी करत असतात. यशस्वी झाल्यानंतर हे तरुण अधिकारी ' लोकाभिमुख प्रशासन ' चालवतील अशी अपेक्षा असते. मात्र या पदभरतीची चिकित्सा केल्यास यातील त्रुटी लक्षात येतात. महसूल, शिक्षण, नगरविकास, जलसंपदा, शिक्षक भरती, तलाठी भरती अशा अनेक विभागांच्या भरती प्रक्रियांमध्ये पेपर फुटल्याची, भ्रष्टाचार झाल्याची चर्चा हल्ली सगळीकडे होताना दिसते. वृत्तपत्रांमध्ये देखील याविषयीचे अनेक वृत्त प्रकाशित होत असतात. एकीकडे हा विद्यार्थी वर्ग मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करत असतो, अन् दुसरीकडे हा भ्रष्टाचार, पेपर फुटीचे प्रकरणे या बाबी विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम करत असतात. परिणामी या विद्यार्थी वर्गाचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत व्हायला लागतो. 'शासन-प्रशासनच भ्रष्ट असल्याने आपण प्रामाणिकता का जपायची, अशी नकारात्मक मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला लागते.' अन् शेवटी...

73. विकासाच्या वाटेवरील भारत!

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार हा सुदृढ लोकशाहीचा गाभा आहे. आधुनिक युगात आपली मते/विचार मांडण्यासाठी ' सोशल मीडिया ' सर्वोत्तम साधन ठरतेय. देशातील बहुसंख्य नागरिक सोशल मीडियाच्या विभिन्न प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Instagram, Facebook, X (Twitter) ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली माध्यमे आहेत. दोन आयामांच्या आधारे या विश्लेषणाची मांडणी करूया. पहिल्या आयामानुसार या माध्यमांवर वापरकर्ते आपली मते, विचार, माहिती, जीवन-शैली इतरांशी शेअर करतात. थोडक्यात पहिला आयाम माध्यमांची सकारात्मकता दर्शवितो.  याच्या अगदी विपरीत दुसरा आयाम. याच समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते. दुसरा आयाम माध्यमांची नकारात्मकता उघडकीस आणतो. इंस्टा, फेसबुक अथवा यूट्यूब वरील ' Reels/Shorts ' यावर भारतीय जनतेचा/तरुणांचा भला-मोठ्ठा वेळ व्यतीत होत आहे.  या ' मानसिक व्यसनातून ' आपण तातडीने सुटका करायला हवी. सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापरा...

72. विकासाच्या वाटेवरील भारत!

सत्तेत येण्याकरीता अथवा सत्ता कायम टिकविण्याकरिता विविध राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने कृती-कार्यक्रम आखतात. राजकीय पक्षांकरिता "समान नागरी कायदा / Uniform Civil Code (UCC)" हा या कृती-कार्यक्रमातील प्रमुख साधन आहे. समान नागरी कायदा वेळोवेळी चर्चेचा विषय ठरलाय. राज्यघटनेतील ' अनुच्छेद 44 ' राज्यसंस्थेला समान नागरी संहितेबद्दल निर्देशित करते. ही संहिता लागू करण्याची जबादारीही सोपवते. योग्य परिस्थितीनुरूप नागरी संहिता लागू केली जावी याचे स्मरण अनेकदा न्यायालयानेही करून दिले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात समान नागरी कायद्याचे विधेयक पारित करणारे ' उत्तराखंड ' पाहिले राज्य ठरले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्भूमीवर हे विधेयक पारित केले गेले. आजही विवाह, घटस्फोट, संपत्तीचे वाटप, वारसा, दत्तक इत्यादी बाबी ' धर्माधिष्ठित व्यक्तिगत कायद्याद्वारे ' ठरविल्या जातात. धर्मनिहाय विभिन्नता यात दिसते. धर्माधिष्ठित व्यक्तिगत कायद्यातील विभिन्नता नष्ट व्हावी आणि नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता/कायदा अस्तित्वात यावा याकरिता UCC ची तरतूद करण्यात आली होती.   धर्माधिष्ठित...

71. विकासाच्या वाटेवरील भारत!

"सर्वाइकल कॅन्सर (Cervical Cancer)" हा या आठवड्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात देखील याविषयीचे वक्तव्य करण्यात आले आहे. 'केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लसीकरणावर भर देणार,' अशी घोषणा करण्यात आली आहे. मुळात, सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय?, त्याची लागण कशी होते?, त्यावरील उपाय-योजना काय? या प्रश्नांची उकल करण्याकरिता सदरील लेख प्रस्तुत करीत आहे. प्रामुख्याने Human Papillomavirus (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या मुखामध्ये हा कर्करोग होतो यालाच सर्वाइकल कॅन्सर म्हणतात. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास या विषाणूची लागण जलदगतीने होते. लक्षणांविषयी -  1. पाठ, पाय किंवा ओटीपोटात ( Pelvis ) सतत वेदना. 2. लैंगिक संभोगादरम्यान वेदना. 3. लैंगिक संभोगानंतर असामान्य रक्तस्राव (Bleeding). 4. मासिक पाळी दरम्यान जास्त काळासाठी रक्तस्राव. 5. रजोनिवृत्ती ( Menopause ) नंतर असामान्य रक्तस्त्राव. 6. वजन कमी होणे, थकवा आणि भूक न लागणे. इत्यादी... उपाययोजने विषयी -  उपरोल्...