Posts

Showing posts with the label JUL23

44. विकासाच्या वाटेवरील भारत!

या लेखामध्ये मी एक परीक्षार्थी अथवा स्पर्धक म्हणून विचार मांडीत आहे. विविध परीक्षांची तयारी आमचा तरुण वर्ग करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत त्यात गुंतलेली असते. स्पर्धा परीक्षेत उतरण्याची अनेकांची विविध कारणे असतात. सूक्ष्मपणे निरीक्षण केले असता लक्षात येते की, 'आर्थिक मागासलेपण' अनेकांना स्पर्धेच्या रणांगणात उतरविते. किंबहुना विद्यार्थ्यांना ते परवडणारे असते. थोडक्यात, विद्यार्थी आपला पैसा पुस्तकांवर खर्च करतात, अभ्यास करतात, अन् कुठलीतरी नोकरी मिळवितात. यातला एक महत्वाचा टप्पा असतो 'फॉर्म भरण्याचा...' फॉर्म भरण्यासाठी एक ठराविक रक्कम 'चलन' म्हणून द्यावी लागते. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे धोरण नमूद करणे योग्य ठरेल. खरेतर हा मुद्दा नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे... महाराष्ट्र शासनाने आरक्षित वर्गासाठी 900 रुपये आणि खुल्या वर्गासाठी 1000 रुपये अशी चलन रचना केली आहे. यातल्या 100 रुपयाच्या तफवतीचा तर्क मला अद्यापही समजला नाही. यात पुन्हा आमचे फॉर्म भरणारे काका 100 रुपये त्यांच्या मजुरीच्या स्वरूपात त्यात भर घालतात. आता खुल्या वर्गाला 1100 र...

43. विकासाच्या वाटेवरील भारत!

मणिपूरमध्ये घडलेल्या अमानवीय कृत्याबद्दल या लेखाच्या माध्यमातून 'प्रतिसाद आणि प्रतिक्रिया' नोंदवत आहे. ही संपूर्ण घडामोड आपणांस चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. काही पुरुषांच्या गटाने दोन स्त्रियांना नग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरवले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यांची घरे जाळण्यात आली. '4 मे' च्या व्हिडिओने '19 जुलै' ला अख्या भारताची झोप उडवली. अनेकांनी Tweets केलेत, विविध आश्वासने दिलीत. केवळ भाषणबाजी करून काहीही हाती लागणे नाही. गरज आहे ती ' कृतीशील प्रतिसादाची '... गुन्हा घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात पण असे 'गुन्हे घडूच नये अथवा अशा गुन्ह्यांना पाठबळ मिळूच नये. अशी शासन-प्रशासनाची भूमिका असावी.' अन् त्या शासनावर, त्या प्रशासनावर शोधकबुद्धी, सुधारकवृत्ती असलेल्या समाजाचे वर्चस्व असावे.  ज्या भारताला तुम्ही मातेचा दर्जा देताय त्या देशात स्त्रियांना नग्न अवस्थेत भर रस्त्यावर छळल्या जातयं. काही प्रकरणे उघडकीस येतात तर काही प्रकरणांची मुस्कटदाबी केल्या जाते. गुन्हेगारीला पाठबळ देऊन आपण प्रशासनाला नागड करतोय हे लक्षात घ्यायला हवं.  टोकाची प्र...

42. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या दोन दिवसांपूर्वी ' चंद्रयान-3 ' चा जयघोष तुम्ही-आम्ही बघितला. खरेतर प्रत्येक नागरिकासाठी ही गर्वाची बाब आहे. या प्रत्येक नागरिकाने निदान चंद्रयान-3 काय?, भारतासाठी ते महत्वाचं कसं? अशी चिकित्सक प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्वाचे ठरते. या मोहिमेचं महत्व थोडक्यात पटवून देण्यासाठी सदर लेख सादर करीत आहे. ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरते. अंतराळात विविध शोध-मोहिमा राबवणारे प्रगत देश जसे रशिया, जपान, चीन, अमेरिका यांच्या यादीत भारताला स्थान मिळतंय. अगदी कमी खर्चात या मोहिमांचे आयोजन करण्यासाठी 'इस्रोला' ओळखण्यात येत आहे. चंद्रावर विविध वैज्ञानिक प्रयोग या मोहिमेतून शक्य होणार आहे. भारतीय वैज्ञानिकांची उत्कटता, अचूकता यातून दिसते. भारताच्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांकडे जगदेखील लक्ष ठेऊन आहे.  चंद्रावर जाण्याचा हा तिसरा प्रयत्न. याअगोदर आलेल्या अपयशातून इस्रोचे/वैज्ञानिकांचे सातत्य डगमगले नाही. 'प्रयत्नातील सातत्यच यशाचा मार्ग निश्चित करीत असते.' हे आपणदेखील शिकायला हवे. प्रगत राष्ट्रांनी सुरू केलेल्या या अंतराळातील स्पर्धेत भारताचा यशस्वी सहभाग...

41. विकासाच्या वाटेवरील भारत!

सध्याची राजकीय परिस्थिती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी लेख सादर करीत आहे. मानवाच्या ऐतिहासिक वर्तनाचा आढावा घेतल्यास एक बाब लक्षात येते. साधारणतः अश्मयुगाचा जर विचार केला तर त्यावेळी मानव जगण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होता. पुढे मानवाच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा-भूक-वासना इत्यादींचा विकास होत गेला. या बाबी शमविण्यासाठी तो शक्य तेवढी नैसर्गिक साधने जमवायला लागला. ज्यांच्याकडे अधिक साधने होती तो व्यक्ती अथवा गट कमी संसाधने असणाऱ्या गटावर अधिपत्य/सत्ता गाजवायला लागला. अन् यातून जन्म झाला असमानतेचा . अर्थातच त्याठिकाणी राजकारण/सत्ताकारण सुरू झाले. आज उत्तर-आधुनिक जगात आपण जगतोय. मानवाच्या गरजा देखील वाढल्या. अन् गरज पूर्तीसाठी, संरक्षणासाठी मानवाने एक प्रबळ राज्यसंस्था निर्माण केली. मात्र राज्यसंस्था केवळ सत्तेचा हाव असणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनली. महाराष्ट्रातील राजकारण एक उत्तम उदाहरण ठरेल. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता प्रश्न पडतो, हा राजकीय गदारोळ खरच जनकल्याणासाठी आहे काय? की केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हा खटाटोप सूरुय... शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर हो...

40. विकासाच्या वाटेवरील भारत!

बऱ्याचदा मला 'जगावं कसं' हा प्रश्न पडतो... सगळ्याच विवेकी मनुष्यप्राण्याला हा प्रश्न पडतोच... याच प्रश्नाच्या उत्तराचा व्यक्ती शोध घेत असते. अन् यातील सर्वमान्य शोध म्हणजेच 'जगावं असं की ज्या समाजात आपण वावरत आहोत, त्या समाजाला अनुरूप आपले आचार-विचार, राहणीमान असावं.' याला एक पुस्तकी सिद्धांत म्हणता येईल, मात्र प्रत्यक्षात यात दुविधा निर्माण होताना दिसते.  ज्यावेळी आपण एखाद्या समाजाची चिकित्सा करतो त्यावेळी त्यातील सगळ्याच योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. पण भारतात चिकित्सा करणाऱ्यांची संख्या जरा कमीच... अन् डोळेझाकपणे अयोग्य बाबी स्वीकार करणारे जरा जास्तच... याच तफावतीमुळे अनेक अनिष्ट रूढी-परंपरा समाजात रुतून बसलेल्या दिसतात. मग पुन्हा प्रश्न पडतो, जगावं कोणत्या समाजासाठी? याच अगदी सोप उत्तर म्हणजे ' जगावं त्या समाजासाठी जो समाज न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रदान करतोय.' कुठलाच समाज परिपूर्ण नसतो. समजाचा विकास व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, नैतिक विकासवरून ठरतो.   राज्यघटनेतील 'कलम 51A' जगावं कसं ...