26. विकासाच्या वाटेवरील भारत!
'कलम 20 अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण पुरविते.' 1. एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीसाठी/अपराधासाठी तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वयेच कारवाई करता येते. म्हणजेच एखादा गुन्हा घडला त्यावेळी अशा गुन्ह्याबाबत उपलब्ध असलेल्या कायद्यानुसारच शिक्षा केली जाते. गुन्हा घडून गेल्यानंतर त्याबाबत कायदा करून शिक्षा देणे अवैध ठरते. शिक्षेचे स्वरूपही प्रचलित कायद्यानुसार ठरेल. 2. एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालविला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. एखाद्या व्यक्तीवर खटला चालवून शिक्षा झाली असेल तर पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी त्याच्यावर खटला चालवून शिक्षा देता येत नाही. तथापि एखाद्या गुन्ह्यातून व्यक्तीची निर्दोष सुटका झाली असेल तर त्याच गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीवर पुन्हा खटला चालवून शिक्षा केली जाऊ शकते. 3. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरूध्द साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. हे संरक्षण वक्ती तथा संस्थेसाठी उपलब्ध होते. उदाहरणासाठी ' जय भीम ' चित्रपटातील प्रसंगाचा संदर्भ आपण घेऊ शकतो. ज्यामध...