83. विकासाच्या वाटेवरील भारत!

राज्यघटनेची प्रस्तावना आणि घटनेतील विविध कलमांनुसार भारतीय गणराज्य 'धर्मनिरपेक्ष' असल्याचे निश्चित होते. चार मुद्द्यांच्या आधारे "भारतीय धर्मनिरपेक्षता" समजून घेता येईल.

पहिला मुद्दा म्हणजेच राज्यसंस्थेचा कुठलाही अधिकृत धर्म नसेल.
दुसरा मुद्दा - राज्यसंस्था सर्व धर्मांबाबत आदर व्यक्त करेल. तिसरा मुद्दा - कुठला धर्म स्विकारावा अथवा कुठल्या धर्माविषयी श्रद्धा असावी हे ठरविण्याचा अधिकार व्यक्तीला असेल.
चौथा मुद्दा म्हणजेच राज्यसंस्था धर्माच्या क्षेत्रापासून वेगळी असेल, आवश्यकता असल्यावरच तिला धर्माच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करता येईल.

याच आधारावर राज्यसंस्था कार्यान्वित असणे अपेक्षित. मात्र देशातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सदस्यांच्या लोकसभा निवणुकीसंदर्भातील भाषणात 'धर्म' ही बाब केंद्रस्थानी दिसते.

उदाहरणासाठी प्रधानमंत्रीचे राजस्थानच्या प्रचारसभेतील भाषण नमूद करता येईल. काँग्रेस सत्तेवर आल्यास सर्व साधनसंपत्ती मुसलमानांकडे वळविली जाईल, तुमच्या हक्काची कमाई काँग्रेस जास्त मुले असलेल्यांत वाटेल अशा आशयाचे विधान त्यांनी केले. या विधानाची तार्किकता अनेकांनी तपासली.

अधिकाधिक मते मिळविण्याच्या हेतूने धर्माचा आधार घेऊन अतार्किक विधाने करणे 'आदर्श आचारसंहितेचा' भंगच ठरतो. 'राष्ट्रापेक्षा जाती-धर्माला अधिकचे महत्व दिल्यास देशाची अधोगतीच साध्य होते.' हे आपण लक्षात घ्यायला हवे.

या अगोदरही "धर्म आणि राजकारण" या आशयाचा लेख मी प्रकाशित केला होता (लेख क्र. 16/2). तोही वाचकांनी आवर्जून वाचावा...

प्रचार सभेतील नेत्यांची भाषणे-विधाने आपण तर्काच्या कसोटीवर तपासून पाहायला हवी. त्यातील तथ्य आपण शोधायला हवे. आणि त्यानंतरच योग्य उमेदवाराला मते द्यायला हवी..!


~ सचिन विलास बोर्डे

19/4

Secularism | Communal Politics | Political Parties | Indian Constitution | Religion | Model Code of Conduct | Loksabha Election 2024 | Election Awareness | Voters


Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!