84. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारताने कोविड-19 ला आटोक्यात आणण्याकरिता प्रामुख्याने 'Covishield' आणि 'Covaxin' या लसींना मान्यता दिली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात भारताला यश मिळाले.
कोव्हिशिल्ड बनविणारी 'ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca)' या ब्रिटन मधील औषध कंपनीने नुकतीच एक कबुली दिल्याने अनेकांच्या मनात संशय अन् भीती निर्माण झालीय. भारतात कोव्हिशिल्डची निर्मिती पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूटने' केली होती. आणि तिच्या 175 कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या.
ॲस्ट्राझेनेकाच्या मते कोव्हिशिल्ड लशीमुळे काही दुर्मिळ रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स / Platelet कमी होणे (Thrombocytopenia Syndrome -TTS) आणि रक्तात गुठळ्या / Blood Clots तयार होणे (Thrombosis) या बाबी दिसून येऊ शकतात.
चार वर्षानंतर उलगडा झालेला हा 'दुर्मिळ दुष्परिणाम' दुर्लक्षित करण्याइतका निश्चितच नाही. हा दुर्मिळ दुष्परिणामच नागरिकांचा शासनावरील, प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरील विश्वास कमी करण्यास पुरेसा ठरतो.
भारतात 'सार्वजनिक आरोग्य' हा जरी राज्याच्या अखत्यारीतला विषय असला तरी यावर केंद्र आणि राज्याने सहकार्याने कार्य करायला हवे. आणि सक्षम आरोग्य यंत्रणा अन् आरोग्य सुविधा पुरवायला हव्या.
लशीसंदर्भात निर्माण झालेल्या या समस्येवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कोरोना पासून वाचवणाऱ्या लसीच जीवघेण्या ठरू लागतील..!
~ सचिन विलास बोर्डे
20/1
COVID -19 | Covishield | Covaxin | AstraZeneca | Serum Institute of India | Public Health | Vaccination | Corona Virus
Comments
Post a Comment