82. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या "नागरी सेवा (Civil Services)" परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! मात्र जे या स्पर्धेत अपयशी ठरलेत, हा लेख त्यांच्याकरीता...

भारतात मोठ्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्यासाठी पैसा तर लागणारच, त्यासाठी पैसा जमवून ठेवणे इष्टच. शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक ठरते.

क्लासेस लावलेले असो वा नसो UPSC सर्वांनाच समान संधी देते. यामुळेच निकालपत्रात क्लासेस लावलेले अन् न लावलेले दोन्ही विद्यार्थी झळकतात.

आयोगानुसार, गतसाली या परिक्षेकरिता 10,16,850 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,92,141 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,624 उमेदवार मुख्य (लेखी) परीक्षेस पात्र ठरले. शेवटी 2,855 उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी / Personality Test पार पडल्यावर 1016 उमेदवारांची अंतिम निकालपत्राद्वारे शिफारस करण्यात आली आहे.

या आकडेवारीनुसार परीक्षेची काठिण्य पातळी आणि यशस्वी होण्याची संभाव्यता कळते. विद्यार्थी त्यांच्या जीवनाचा कार्यक्षम वेळ अभ्यासात व्यतीत करतात. मात्र ते यशस्वी होतीलच याची शाश्वती नसते. तरीदेखील ते प्रयत्न सोडत नाहीत.

बऱ्याचदा यात अपयशी झालं की नकारात्मक विचार यायला लागतात. या नकारात्मक विचारांना आळा घालत पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे कौशल्य या विद्यार्थ्यांत बऱ्यापैकी असते. हेच प्रयत्न अन् सातत्य या विद्यार्थांना 'Steel Frame of India' चा भाग बनविते..!

~ सचिन विलास बोर्डे

19/3

Union Public Service Commission - UPSC | Civil Services Examination - CSE | Result | Students | Exams | Education | Bureaucracy


Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!