76. विकासाच्या वाटेवरील भारत!
"एखाद्या समाजाची अथवा देशाची प्रगती ही तिथल्या महिलांच्या प्रगतीवरून ठरते," हे वैश्विक सत्य. यामुळेच 'स्त्री-सक्षमीकरणाची' चर्चा जागतिक पातळीवर केली जाते.
इतिहासाची पाने चाळल्यानंतर आपणांस लक्षात येईल की, स्त्री-वर्गाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या हक्काचा वाटा मिळविण्याकरिता अनेकदा संघर्ष करावा लागला.
एकोणिसाव्या शतकात 'स्त्रीवादाने' वैचारिक तत्त्वज्ञान मांडून स्त्रियांच्या हक्कांच्या मागणीला व्यापकता प्रदान केली. भारतातील महिलांना देखील पुरुषांप्रमाणे हक्क-अधिकार असावेत, त्यांनीही शिक्षित व्हावे याकरिता 'सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांनी' रुढीवादी व्यवस्थेला विरोध करत आधुनिक शैक्षणिक मूल्यांची सुरू केलेली चळवळ देखील अत्यंत महत्वपूर्ण बनली.
शेवटी याच ऐतिहासिक जडणघडणींचा प्रभाव 'भारतीय संविधानावर' पडला. यातून विविध हक्कांच्या व्यापक तरतुदी स्त्रियांसाठी करण्यात आल्या. परिणामी, (पुरुषसत्ताक व्यवस्थेत) महिलांनाही स्वतःच्या विकासाची/प्रगतीची संधी प्राप्त झाली.
उपरोक्त सैद्धांतिक विश्लेषणानंतर वास्तविक स्थिती लक्षात घेऊया.
अनेक स्त्रिया विभिन्न क्षेत्रात मोठी कामगिरी बजावताना दिसतात. केवळ त्यांच्या आधारावर सगळ्याच महिलांची स्थिती सुधारली या निष्कर्षावर पोहोचणे अतार्किक ठरते.
आजही असंख्य समस्यांशी स्त्रिया झुंजताना दिसतात. आजही महिलांना आपल्या हक्क प्राप्तीसाठी व्यवस्थेशी संघर्ष करावा लागतोय. समाजाची बुरसटलेली मानसिकता आणि शासन-प्रशासनाचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत मानला जाऊ शकतो..!
~ सचिन विलास बोर्डे
18/2
Feminism | History of Women Empowerment | Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule | Indian Constitution | Patriarchal Society
Comments
Post a Comment