77. विकासाच्या वाटेवरील भारत!
कथेची सुरुवात होते 2017 मध्ये. ज्यावेळी 'भाजप' सरकारने अर्थसंकल्पाद्वारे "निवडणूक रोख्यांची (Electoral Bonds)" योजना कार्यान्वित केली.
याद्वारे कोणतीही व्यक्ती, कंपनी, नोंदणीकृत संस्था कितीही रकमेचे निवडणूक रोखे 'स्टेट बँकेच्या' निर्धारित शाखेतून खरेदी करून हव्या त्या राजकीय पक्षाला सुपूर्द करीत असे.
मात्र यातून मतदारांच्या 'माहितीच्या अधिकाराचे' उल्लंघन होते या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने ही योजना असंवैधानिक ठरवून 2024 मध्ये या अपारदर्शक कथेचा शेवट केला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रोख्यांचा तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. या तपशीलातून अनेक तथ्य आणि सत्य उघडकीस येत आहे.
वादग्रस्त कंपन्यांनी कोट्यवधींची रोखे खरेदी केले. आणि राजकीय पक्षांना सुपूर्द केलेत. सत्ताधाऱ्यांद्वारे विविध 'शासकीय तपास यंत्रणेच्या' साहाय्याने या कंपन्यांना पैसे देण्यास मजबूर केले की काय? हा मोठा प्रश्नच.
थोडक्यात, सत्ताधारी पक्षांचे आणि बड्या भांडवलदारांचे / Corporates चे साटेलोटे यातून उघडकीस येण्यास मदत झाली.
सर्वोच्च न्यायालयाने देशातील निवडणूक प्रक्रिया कॉर्पोरेट्सच्या हातात जाण्यापासून रोखण्याचे एक पाऊल टाकले आहे. यापुढे देशातील मतदारांनी ठरवावे, त्यांना लोकांद्वारे-लोकांसाठी चालविली जाणारी 'लोकशाही' हवी की, मूठभर भांडवलदारांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या हाती असलेली 'कॉर्पोरेटशाही' हवी..!
~ सचिन विलास बोर्डे
18/3
Electoral Bonds | State Bank of India (SBI) | Election Commission Of India (ECI) | Supreme Court | Democracy | Corporates | Crony Capitalism | Politics
Comments
Post a Comment