65. विकासाच्या वाटेवरील भारत!
कृषी क्षेत्राचा भारतीय 'अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत' मोठा वाटा आहे. बऱ्याचदा कृषी क्षेत्राला भारतीय 'अर्थव्यवस्थेचा कणा' देखील संबोधल्या जाते.
2020-21 मध्ये नोंद करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये (GDP) 19.9% हिस्सा शेती क्षेत्राचा आहे. ग्रामीण भागातील जवळ-जवळ 70% लोकसमुह शेतीवर अवलंबून आहे. उत्पन्नाचा आणि उदरनिर्वाहाचा एक स्रोत म्हणून शेती केल्या जाते.
जमिनीच्या मशागतीपासून चांगले पीक येईपर्यंत मोठ्ठं भांडवल शेतकऱ्याला शेतीमध्ये गुंतवावे लागते. कर्ज घेऊन शेती करणाऱ्यांचं प्रमाण अधिकच. कर्ज उभारण्याकरिता बँका अन् सावकारांची मदत घेतली जाते. भांडवलाची जमवा-जमव झाली की बी-बियाणे, खते आणि इतर आवश्यक साधने खरेदी केल्या जातात. शेवटी अपेक्षित उत्पन्न किंवा पीक मिळाले तर योग्यच. नाहीतर पुन्हा शेतकऱ्याला मागील कर्ज फेडण्याकरिता नवीन कर्जाची उभारणी करावी लागते. थोडक्यात हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो. भारतातील अनेक राज्यांची ही वस्तुस्थिती आहे. (लेख क्र. 3/4)
भारतीय लोकसंख्येला किमान पुरेपूर अन्न मिळण्याकरिता कृषी क्षेत्राला सक्षम करणे अतिमहत्वाचे आहे.
शासनाने अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणि तंत्रज्ञान विकसित केलंय खरं, पण त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कृषी विषयक योजनांचा लाभ मिळविण्याकरिता अनेकदा शेतकऱ्यांना काही रक्कम भ्रष्ट अधिकाऱ्यांना/अंमलदारांना द्यावी लागते. या भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता आणि शेतकऱ्यांना आवश्यक शिक्षण-प्रशिक्षण-कौशल्ये उपलब्ध करून देण्याकरिता शासन-प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यायला हवी..!
~ सचिन विलास बोर्डे
15/4
Farmers | Indian Economy | Agriculture Sector | GDP | Corruption
Comments
Post a Comment