13. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 डिसेंबर अर्थातच शेतकरी दिवस. भारतभर या दिवशी शुभेच्छावर्षाव होतो. विविध माध्यमातून शेतकऱ्यांना धन्यवाद देण्याचा हा प्रयत्न. हा एक आयाम, अन् तितक्याच कटाक्षाने दुसऱ्या आयामांकडे लक्ष देणे महत्वाचे.

दुसऱ्या आयामांचा विचार करता असे लक्षात येते की, कर्जबाजारीपणा, गरिबी, उपासमार, मानसिक तणाव, आत्महत्या ह्या समस्येचं डोईजड ओझ घेऊन शेतकरी जगतोय. सुख-समृद्धी त्याच्यासाठी काल्पनिकच..!

"शेतकऱ्याची स्थिती" -
नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. गेल्या वर्षभरात जवळपास 10 हजार 881 शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केलीय.

बाजार समिती मधल्या दलालांकडून होणारी पिळवणूक, बँकद्वारे कर्ज देण्यात दिरंगाई, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांमधील महागाई इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याच्या वाटेला ह्या समस्या आलेल्या दिसतात.

"उपाययोजना" -
शेतकऱ्यांना पीक/आधुनिक तंत्रज्ञान/हवामान/ खते, बी-बियाणे याबद्दल पुरेशी माहिती देणे. 
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य पातळीवर विविध योजना राबविल्या जातात, त्यांची केवळ 'माहिती नाही' म्हणून शेतकरी वंचित राहू नये. याची जबाबदारी निश्चितच केंद्र आणि राज्य सरकारच्या शासन-प्रशासनाची होय.

भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि एकंदरीत भारताचा कणा आसलेल्या कृषी क्षेत्राचा विकास करणे प्रत्येकाची जबाबदारी ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

3/4

Farmers | Agriculture | Policies 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!