Posts

Showing posts with the label Students

138. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.  उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात य...

136. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) द्वारे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! अन् जे या स्पर्धेत येऊ इच्छितात, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्याकरिता पैसा आवश्यकच. म्हणून पुरेस शिक्षण घेता येईल इतकी शिक्षणाकरिता आर्थिक तरतूद करूनच ठेवावी. यंदाचा निकालात ' शेतकऱ्यांची मुले, कामगारांची मुले, रिक्षा चालकांची मुले, मेंढपाळांची मुले या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात मग आपण का नाही, ' याच विचाराकडे अनेक विद्यार्थी अन् पालकांचे दिल खेचले गेले. या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता समजण्याकरिता पुढील आकडेवारी नमूद करीत आहे. आयोगानुसार, या परिक्षेकरिता 9,92,599 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,83,213 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,62...

97. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच दिल्लीतील ' जुन्या राजेंद्रनगर (ORN) ' भागात घडलेली दुर्घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. राव आयएएस स्टडी सर्कल या शिकवणी क्लासेसच्या तळघरात पावसाचे पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेकडे लक्ष वेधण्याकरिता अन् विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याकरिता इतर विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केलीत. यातून शिकवणी क्लासेसवाल्यांची झोप उडाली अन् झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. दिल्लीच्या ORN भागात अधिकारी घडविणाऱ्या अनेक ' फॅक्टऱ्या ' (क्लासेस) आहेत. देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिकण्याकरिता त्याठिकाणी जातात. क्लासेसवाल्यांचा, लायब्ररीवाल्यांचा, घरे भाड्याने देणाऱ्यांचा, मेसवाल्यांचा या विद्यार्थ्यांमुळे चांगलाच फायदा होतो. या सगळ्यांना फायदा महत्त्वाचा असल्याने हे गुणवत्तेकडे जास्तीचे लक्ष देत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. कदाचित क्लासेसवाल्यांचे वाचनालय तळघरात नसते, प्रशासनाने अवैध बांधकामांवर वेळीच कार्यवाही केली असती, विद्यार्थ्यांनी गैरसोईबद्दल वेळोवेळी तक्रारी केल्या असत्या तर कदाचित त्या तिघांचे आयुष्य बुडाले नसते. क्ल...

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...

82. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! मात्र जे या स्पर्धेत अपयशी ठरलेत, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात मोठ्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्यासाठी पैसा तर लागणारच, त्यासाठी पैसा जमवून ठेवणे इष्टच. शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक ठरते. क्लासेस लावलेले असो वा नसो UPSC सर्वांनाच समान संधी देते. यामुळेच निकालपत्रात क्लासेस लावलेले अन् न लावलेले दोन्ही विद्यार्थी झळकतात. आयोगानुसार, गतसाली या परिक्षेकरिता 10,16,850 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,92,141 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,624 उमेदवार मुख्य (लेखी) परीक्षेस पात्र ठरले. शेवटी 2,855 उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी / Personality Test पार पडल्यावर 1016 उमेदवारांची अंतिम निकालपत्र...

74. विकासाच्या वाटेवरील भारत!

सध्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या ' भरती प्रक्रिया ' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक शासकीय आणि खाजगी संस्थांच्या मदतीने विविध पदे भरली जात आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी ही पदे मिळविण्याकरिता तयारी करत असतात. यशस्वी झाल्यानंतर हे तरुण अधिकारी ' लोकाभिमुख प्रशासन ' चालवतील अशी अपेक्षा असते. मात्र या पदभरतीची चिकित्सा केल्यास यातील त्रुटी लक्षात येतात. महसूल, शिक्षण, नगरविकास, जलसंपदा, शिक्षक भरती, तलाठी भरती अशा अनेक विभागांच्या भरती प्रक्रियांमध्ये पेपर फुटल्याची, भ्रष्टाचार झाल्याची चर्चा हल्ली सगळीकडे होताना दिसते. वृत्तपत्रांमध्ये देखील याविषयीचे अनेक वृत्त प्रकाशित होत असतात. एकीकडे हा विद्यार्थी वर्ग मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करत असतो, अन् दुसरीकडे हा भ्रष्टाचार, पेपर फुटीचे प्रकरणे या बाबी विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम करत असतात. परिणामी या विद्यार्थी वर्गाचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत व्हायला लागतो. 'शासन-प्रशासनच भ्रष्ट असल्याने आपण प्रामाणिकता का जपायची, अशी नकारात्मक मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला लागते.' अन् शेवटी...

69. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केलीय. यानुसार खाजगी क्लासेसला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. क्लासेसविषयी इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर अथवा प्रॉस्पेक्टसमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहे. शिक्षकांच्या पात्रते विषयीच्या तरतुदी देखील या नियमावलीत आहे. अत्यंत महत्वाचा नियम म्हणजेच, 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये नोंदणी करता येणार नाही.  मोठ-मोठ्या शहरांमध्ये आकाशाला स्पर्श करणारे होर्डिंग्ज/बॅनर क्लासेसद्वारा लावण्यात येतात. अनेकदा हे होर्डिंग्ज शैक्षणिक दिशाभूल (Mislead) करणारे असतात. भरघोस गुणांचे आमिष दाखविण्यात येते. परिणामी विद्यार्थी-पालक यास बळी पडतात. काही क्लासेस विद्यार्थ्यांना शिकविण्याचे लाखभर रुपये घेतात. थोडक्यात, शिक्षणातही महागाईने शिखर गाठल्याचे दिसते.  सरकारी शाळांतील मिळणाऱ्या ' अपुऱ्या शिक्षणाला ' पर्याय म्हणून पालक खाजगी क्लासेस चा पर्याय निवडतात. नवीन नियमांद्वारे या पर्यायावर मर्यादा येत असल्याने सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याकडे केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष पुरवायला हवे.    विद्य...

67. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतीच महाराष्ट्रातील तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी प्रकाशित झाली. ज्यावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. 200 गुणांचा पेपर अन् 200 पेक्षा जास्त गुण काही विद्यार्थ्यांना देण्यात आले. हे कुठले सामान्यीकरण (Normalisation) म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खाजगी कंपन्यांना परीक्षेचा कारभार सोपवल्यानंतर अशा तांत्रिक अडचणी यायला नको होत्या. पेपर सुरू असताना देखील काही ठिकाणी पेपर फुटीच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या बाबी सरकारच्या आणि खाजगी कंपन्यांच्या अकार्यक्षमता उघडकीस आणतात. याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. सरकारवरील, परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरील विश्वासाला तडा जातो. ' पैसे देऊन अधिकारी होता येते ' ही समजूत खरी ठरायला लागते. एकंदरीतच विद्यार्थ्यांचा शासन-प्रशासनाविरोधात असंतोष वाढण्यास बळ मिळते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1000 रुपयांचे चलन भरले होते. ज्यातून ' कोटी रुपयांचा ' महसूल जमा झाला. त्या रकमेचा योग्य रीतीने वापर करून पारदर्शकपणे परीक्षा घेणे तसेच निकाल लावणे ही शासनाची भूमिका असायला हवी होती. ' केवळ सिरियस विद्यार्थी परीक्षेत बसावे...

45. विकासाच्या वाटेवरील भारत!

"ज्ञान बाटने से बढ़ता हैं।" हे सूत्र अनेकदा आपल्या कानावर पडत असते. पण हे ज्ञान वाटायला कुणाला वेळ मिळेना... अन् हल्ली मोठ-मोठ्या शाळा, संस्था ज्ञान वाटण्यासाठी भली-मोठ्ठी रक्कम घ्यायला लागल्या. आपल्याकडे फक्त नोकरीसाठी शिक्षण देण्यात येते आणि घेण्यात येते. घेतलेलं शिक्षण/ज्ञान आपण इतरांपर्यंत पोहोचवत नाही. नोकरी लागली की त्या शिक्षणाला आपण स्थगिती देतो. 'खरेतर शिक्षण केवळ पद-पैसा-प्रतिष्ठा मिळविण्याकरिता नसून, घेतलेलं शिक्षण हे समाजकार्यासाठी, समाजकल्याणासाठी असावे.' कारण प्रत्येक नागरिक आपल्या समूहाचे प्रतिनिधित्व करीत असतो. परिणामी 'स्वार्थी शिक्षण' घेऊन त्याने केवळ आपला संसार सुखकर न करता समाजाचाही विचार करावा. माझी विवेकी तरुण वर्गाला विनंती असेल, तुम्ही साचवलेलं ज्ञान मर्यादित ठेऊ नका. व्यक्त व्हायला शिका, लिहायला शिका, स्वतःची वैचारिक पातळी वाढवा, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण ई. क्षेत्रांमध्ये निर्भीडपणे आपले मत मांडा, प्रत्येक मुद्द्याची तार्किक तपासणी करा. सोशल मीडियाची अनेक व्यासपीठे (Platforms) तुमच्यास...

44. विकासाच्या वाटेवरील भारत!

या लेखामध्ये मी एक परीक्षार्थी अथवा स्पर्धक म्हणून विचार मांडीत आहे. विविध परीक्षांची तयारी आमचा तरुण वर्ग करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत त्यात गुंतलेली असते. स्पर्धा परीक्षेत उतरण्याची अनेकांची विविध कारणे असतात. सूक्ष्मपणे निरीक्षण केले असता लक्षात येते की, 'आर्थिक मागासलेपण' अनेकांना स्पर्धेच्या रणांगणात उतरविते. किंबहुना विद्यार्थ्यांना ते परवडणारे असते. थोडक्यात, विद्यार्थी आपला पैसा पुस्तकांवर खर्च करतात, अभ्यास करतात, अन् कुठलीतरी नोकरी मिळवितात. यातला एक महत्वाचा टप्पा असतो 'फॉर्म भरण्याचा...' फॉर्म भरण्यासाठी एक ठराविक रक्कम 'चलन' म्हणून द्यावी लागते. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे धोरण नमूद करणे योग्य ठरेल. खरेतर हा मुद्दा नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे... महाराष्ट्र शासनाने आरक्षित वर्गासाठी 900 रुपये आणि खुल्या वर्गासाठी 1000 रुपये अशी चलन रचना केली आहे. यातल्या 100 रुपयाच्या तफवतीचा तर्क मला अद्यापही समजला नाही. यात पुन्हा आमचे फॉर्म भरणारे काका 100 रुपये त्यांच्या मजुरीच्या स्वरूपात त्यात भर घालतात. आता खुल्या वर्गाला 1100 र...

28. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात (7/1) आपण कलम 21 अंतर्गत हक्कांची व्यापकता नमूद केली... त्यातच 86 वी घटना दुरुस्ती करून 'कलम 21 A' समाविष्ट करण्यात आले. 2009 साली ' बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा, 2009 ' पारित केला गेला. 'कलम 21 A - 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करते.' 'मोफत शिक्षण' म्हणजेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षण आत्मसात करताना त्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा खर्च द्यावा लागणार नाही. 'सक्तीच्या शिक्षणाचा' अन्वयार्थ लावायचा झाल्यास, या तरतुदीद्वारे शासनावर काही कार्ये सोपविण्यात आली आहे. जी प्रभावीपणे पार पडायचं बंधन राज्यसंस्थेवर आहे. बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, त्यांचा सक्तीने प्रवेश करून घेणे तसेच त्यांची शाळेतील उपस्थिती कायम असेल याची खातरजमा करणे. अशी ही कार्ये. 2009 च्या कायद्यान्वये अनुसूचित जाती आणि जमाती, सामाजिकदृष्ट्या मागास तथा दुर्बल घटक ( differently able) यांकरिता '25 टक्के' जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या तरतुदींच्या वास्तवातील अंमलबजावणीबाबत - आजही अने...

19. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी 'केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण' ( AISHE ) ने 2020-21 चा अहवाल प्रकाशित केला आहे.  "अहवालानुसार" -  2019-20 ची तुलना करता 2020-21 मध्ये देशभरातील विद्यार्थी नोंदणीत 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंडरग्रेजुएट स्तरावर सर्वाधिक नावनोंदणी आढळून आलेली दिसते. उच्च शिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांची नोंदणी, 2019-20 मध्ये 45% होती, ती 2020-21 मध्ये एकूण नोंदणीच्या 49% पर्यंत वाढली आहे. हे उल्लेखनीय. तथापि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या शाखेत स्त्रियांची नावनोंदणी पुरुषांपेक्षा मागे असलेली आढळते. तसेच इतर काही विवेचन या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचा आपण आढावा घेणे गरजेचे. नावनोंदणीची आकडेवारी वाढली म्हणजे तरूणांमध्ये शिक्षणाचे/साक्षरतेचे प्रमाण वाढले या निष्कर्षाला जाणे चुकीचे ठरेल.  'नोकरीसाठी शिक्षण' ही भूमिका असलेल्या तरुणाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यालये/महाविद्यालयांची गुणवत्ता, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, अपुऱ्या पायाभूत सुविधा, खाजगी क्षेत्रातील शिक्षणामध्ये भ्रष्टाच...