Posts

Showing posts with the label Awareness

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 33/2 मध्ये आपण घरगुती हिंसाचाराच्या समस्येचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या लेखातून घरगुती हिंसाचारासंबंधीच्या केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या अहवालाचे विश्लेषण जाणून घेऊया... भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS) " हा अहवाल प्रकाशित केला जातो. 2019-21 या वर्षाच्या ' NFHS-5 ' या अहवालानुसार,  भारतातील 18 ते 49 वयोगटातील 29% महिला वयाच्या 15 वर्षांपासूनच ' शारीरिक हिंसाचाराला ' बळी पडलेल्या दिसतात. यातील 3% महिला गरोदर असताना शारीरिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. वयानुसार शारीरिक हिंसाचारात वाढ दिसून येते. 18 ते 19 वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण 16% आहे. तसेच 40 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हेच प्रमाण 32% असल्याचे दिसते. अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत ' विवाहित स्त्रियांमध्ये ' शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण 31% आहे आणि शहरी भागात हे प्रमाण 24 टक्के असल्याचे अहवाल नमूद करतो. 18 ते 19 वयोगटातील 6% म...

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडील काही काळात देशाच्या विविध ठिकाणी घडलेल्या " घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) " घटनांच्या पार्श्वभूमीवर सदरील लेख प्रकाशित करीत आहे. ' स्त्रीयांना शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आर्थिक  पातळीवर होणारा छळ म्हणजेच घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचार म्हणता येईल. ' मुख्यत्वे पती अथवा कुटुंबीय या छळास जबाबदार असतात. हे अनेक घटनांवरून सिद्ध होते. या हिंसाचाराला तीन मुख्य प्रकारांत वर्गीकृत करता येईल. 1. शारीरिक हिंसाचार (Physical Spousal Violence)- यामध्ये स्त्रीला मारहाण करणे, जखमी करणे, शारीरिक इजा पोहोचविणे इत्यादी स्वरूपातील शारीरिक हिंसेचा समावेश होतो. 2. लैंगिक हिंसाचार (Sexual Spousal Violence)- स्त्रीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (बलात्कार) करणे इत्यादी बाबींचा समावेश यात करता येईल. 3. भावनिक हिंसाचार (Emotional Spousal Violence)- स्त्रीला शिवीगाळ-अपमानित करणे, अपमानास्पद वागणूक देणे, हानी पोहोचवण्याची धमकी देणे इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. देशातील बहुतांश स्त्रिया वरील तीनही किंवा त्यापैकी कुठल्यातरी एका हिंसाचाराला ...

129. विकासाच्या वाटेवरील भारत!

सोळाव्या शतकात पुण्याजवळील देहू येथे ' तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) ' यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " तुका, तुकोबा, तुकोबाराया " म्हणून ओळख मिळाली. सोळाव्या शतकातील समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समाजातील समाज-जीवन, चाली-रीती, रूढी-परंपरा यावर आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता तसेच समाजसुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता अन् समाजाला योग्य दिशा देण्याकरिता त्यांनी हजारो " अभंगांची " रचना केली. संत तुकारामांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्याकाळी 'नवस केल्याने लेकरं होतात' असा गैरसमज रुजला होता अन् रुजवला गेला होता. यावर तुकोबांनी आपले मत मांडले. ते म्हणतात, " नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।। " अर्थात नवस केल्याने लेकरं झाली असती तर नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुकोबांनी उपस्थित केला. यातून त्यांची तार्किक बुद्धी अन् वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित होतो. समाजातील सर्वांनाच समान हक्क-अधिकार असावते या दृष्टिकोनातून ते लिहितात, " ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार। बाळें नारीन...

127. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या या स्पर्धात्मक युगात मानवाच्या जीवनात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसतेय. हेच नैराश्य डोईजड झालं की अनेकजण " आत्महत्येचा वैफल्य मार्ग " स्वीकारताना दिसताय. "भारताची स्थिती" - 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये 1.7 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 4.2 टक्क्यांनी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालेली दिसते. या जुन्या आकडेवारीवरून सध्याच्या परिस्थितीचे आकलन करता येईल. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेम-प्रकरणे, कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या अशा काही कारणांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे दिसते. अलीकडे तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय?, आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण?, याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केलेत. मात्र यामुळे तरुणांमध्ये चुकीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता दिसतेय. ' आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात ' हीच बाब मला या अनुषंगाने नमूद करावीशी वाटतेय. "उपाययोजना...

125. विकासाच्या वाटेवरील भारत!

" आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम विवाहाला " कुटुंबीयांचा अन् इथल्या सामाजिक व्यवस्थेचा कायमच विरोध राहिलेला आहे. आपल्या लेकरांनी आंतरजातीय विवाह केल्यास आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, समाज आपल्याला जातीबाहेर टाकेल अशी भिती समाजात खोलवर रुजवली गेली. परिणामी आंतरजातीय विवाहाला इथल्या समाजव्यवस्थेने अन् जातव्यवस्थेने प्रोत्साहन दिलेच नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक तरुण-तरुणींनी ' पळून जाऊन लग्न केल्याची ' उदाहरणे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे. मात्र असा प्रेमविवाह केल्यानंतरही कुटुंबियांकडूनच त्यांचा छळ होत आहे, असेही ऐकण्यात येते. बऱ्याचदा हाच छळ ' ऑनर किलिंग ' चे रूप घेतो. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींनीचा कुटुंबातील सदस्यच खून करतात. अशाच घटना छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर, बीड इत्यादी जिल्ह्यात घडलेल्या दिसतात. अशा ऑनर किलिंगच्या घटनांना थांबविण्याकरिता आणि प्रेमविवाह करणाऱ्यांना सुरक्षा देण्याकरिता " सुरक्षा गृह (Safe House) " तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका असल्यास स...

124. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी मूलभूत बाबी जाणून घेतल्या. आजच्या लेखात आपण देशाच्या " करप्रणाली (Tax Structure) " विषयीचा थोडक्यात आढावा घेऊया... भारतात करांचे प्रकार विविध आहेत. मात्र या करांना प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या दोन गटात वर्गीकृत केल्या जाते. A. प्रत्यक्ष कर (Direct Tax) - प्रत्यक्ष कर हे केंद्र आणि राज्य दोघांद्वारे आकारल्या जातात. केंद्राद्वारे आयकर, निगमकर इत्यादी कर आकारल्या जातात. तसेच राज्यांद्वारे जमीन महसूल, व्यवसाय कर इत्यादी कर आकारण्यात येतात. हे कर स्वतःच्या खिशातून द्यावे लागतात. जसजशी व्यक्तीच्या उत्पन्नाची पातळी वाढत जाते त्याप्रमाणात करांचे दरही वाढत जातात. अधिकचा कर सरकारला द्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुमचे वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपये असेल, तर तुमच्या उत्पन्नातील काही रक्कम आयकर स्वरूपात शासनाकडे जमा करावी लागेल. B. अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) - अप्रत्यक्ष करही केंद्र आणि राज्यांद्वारे आकारले जातात.  केंद्राद्वारे सीमा शुल्क, पेट्रोलियम व तंबाखू वरील केंद्रीय उत्पादन शुल्क आणि केंद्रीय विक्रीकर, विवक्षित मुद्रांक शुल्क, Cen...

123. विकासाच्या वाटेवरील भारत!

काल देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला गेला. ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास आणि सामाजिक विकासास चालना मिळते. पायाभूत सोय-सुविधांचा विकास केला जातो. सदरील लेखात यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे तपशीलवार चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. या लेखाद्वारे अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पाची आवश्यकता काय? या मूलभूत बाबी समजून घेण्याकरिता हा लेख पुनः प्रकाशित करीत आहे... ' राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये, राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे "वार्षिक वित्तीय विधान Annual Financial Statement" ठेवतील अशी तरतूद आहे. ' वास्तवात राष्ट्रपतींच्यावतीने ' वित्तमंत्रीच ' हा कारभार पार पाडतात. थोडक्यात, शासनाचे महसुली उत्पन्न आणि खर्चाचा हा तपशील असतो. ज्याद्वारे विविध क्षेत्रात पैसा खर्च करून ते क्षेत्र विकसित केले जाते. विविध राज्यांसाठी आवश्यकतेनुसार आर्थिक तरतुदी पुरवल्या जातात. शासन पायाभूत सुविधांवर अधिकचा खर्च करते. ज्यातून अर्थव्यवस्था गतिशील होऊन रोजगारनिर्मिती होईल अन् नागरिकांचा दर्जा सुधारेल हे गृहितक यामागे असते. नागरिकांचे प्रतिनिधि...

106. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! "जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।" यातूनच प्रेरणा घेत दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक ' 02 OCTOBER 2022 ' रोजी "विकासाच्या वाटेवरील भारत!" या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या लेखमालेतून संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रासंबधित शेकडो विषयांवर मी अगदी मोजक्या शब्दांत लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब देखील मला प्रेरणा देणारी ठरतेय. 'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा विरोधी भूमिका घेणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.' प्रकाशित लेखांबद्दल - या दोन वर्षांच्या काळात सातत्याने प्रत्येक रविवार मी लेख...

91. विकासाच्या वाटेवरील भारत!

" धूम्रपान " आरोग्यास हितकारक नाही... ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. तरीदेखील भारतात धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे हे दर्शविणारा ' इंडिया टोबॅको कंट्रोल रिपोर्ट/अहवाल ' केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रकाशित केला होता. अहवालानुसार, ' किशोरावस्थेतल्या (Adolescents) मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अत्याधिक आहे. ' 2009 ते 2019 या काळात मुलींमधल्या धूम्रपानाच्या प्रमाणात 3.8 टक्क्यांची वाढ होऊन हे प्रमाण 6.2 टक्क्यांवर पोहोचले. मुलांमधील धूम्रपानाच्या प्रमाणात 2.3 टक्क्यांची वाढ झाली. प्रौढ पुरुषांच्या धूम्रपानाच्या प्रमाणात 2.2 टक्क्यांची आणि स्त्रियांच्या प्रमाणात 0.4 टक्क्यांची घट झालीय. धूम्रपानाच्या जीवघेण्या व्यसनात तरुण पिढी (प्रामुख्याने तरुण मुली) अडकल्याचे वास्तव या अहवालातून अधोरेखित होते. किशोरावस्थेतील तरुण-तरुणी ' कूल अन् फॅशनेबल ' दिसण्याकरिता, ' टेन्शन ' पासून मुक्ती मिळविण्याकरिता तसेच इतरांच्या प्रभावाखाली येवून धूम्रपान करतात. मुलीने किंवा प्रौढ स्त्रीने धूम्रपान करणे म्हणजेच ' स्त्री सक्षमीकरणाचं ' प्रतीक असल्याचं चित्र निर्माण के...

78. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या काही दिवसांपासून अन् येणारे काही दिवस देशात सर्वत्र  ' निवडणुकांची ' चर्चा असेल. एकीकडे राजकीय पक्षांत सत्तेत येण्याची ओढ-तान सुरू असेल आणि दुसरीकडे या पक्षांना निवडून देण्याचा अधिकार मतदारांना प्राप्त होईल. थोडक्यात, देशाची येणाऱ्या पाच वर्षांकरिता दिशा ठरविण्याची ' संयुक्त जबाबदारी ' राजकीय पक्षांची आणि मतदारांची असेल. पक्षांना सत्तेत येण्यासाठी मतदार महत्वाचा ठरतो. निवडणुका जवळ आल्या की, या पक्षांद्वारे ' मोहक आश्वासनांचा ' भडिमार व्हायला सुरुवात होते. विकास कामे गतिमान व्हायला लागतात. छुप्या पद्धतीने ' पैसा-दारू-मांस ' इत्यादी इत्यादी वितरीत केल्या जाते. मतदात्यांना आपल्याकडे कसे खेचता येईल याचा हा खटाटोप. मतदारही यांस बळी पडतो, हेच दुर्दैवी वास्तव. शेवटी ' बेजबाबदार शासन ' सत्तेवर येते. अन् मनमानी स्वरूपाचा कारभार सुरू होतो. लोकशाहीच्या आडून हुकूमशाहीच फोफावल्याच चित्र निर्माण होत. मतदारांच्या अपुऱ्या राजकीय समजाचे हे फलित.  नेता आपल्या जाती-धर्माचा आहे म्हणून किंवा भ्रामक आश्वासनांना बळी पडून मोठ्या प्रमाणावर अमुक-अमुक नेत्यास मते दि...

71. विकासाच्या वाटेवरील भारत!

"सर्वाइकल कॅन्सर (Cervical Cancer)" हा या आठवड्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात देखील याविषयीचे वक्तव्य करण्यात आले आहे. 'केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लसीकरणावर भर देणार,' अशी घोषणा करण्यात आली आहे. मुळात, सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय?, त्याची लागण कशी होते?, त्यावरील उपाय-योजना काय? या प्रश्नांची उकल करण्याकरिता सदरील लेख प्रस्तुत करीत आहे. प्रामुख्याने Human Papillomavirus (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या मुखामध्ये हा कर्करोग होतो यालाच सर्वाइकल कॅन्सर म्हणतात. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास या विषाणूची लागण जलदगतीने होते. लक्षणांविषयी -  1. पाठ, पाय किंवा ओटीपोटात ( Pelvis ) सतत वेदना. 2. लैंगिक संभोगादरम्यान वेदना. 3. लैंगिक संभोगानंतर असामान्य रक्तस्राव (Bleeding). 4. मासिक पाळी दरम्यान जास्त काळासाठी रक्तस्राव. 5. रजोनिवृत्ती ( Menopause ) नंतर असामान्य रक्तस्त्राव. 6. वजन कमी होणे, थकवा आणि भूक न लागणे. इत्यादी... उपाययोजने विषयी -  उपरोल्...

62. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच तब्बल 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 ' कामगारांना ' सुरक्षितपणे बाहेर काढण्यात विविध आस्थापना यशस्वी ठरल्यात. हे उल्लेखनीयच. ही घटना कामगारांच्या स्थितीविषयक अनेक प्रश्न उपस्थित करते. सदरील लेखात ' आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने / International Labour Organization (ILO) ' प्रकाशित केलेल्या अहवालाचा आधार घेत, कामगारांच्या स्थितीचे विश्लेषण करीत आहे. अहवालानुसार , विविध खाणी, उत्खनन, बांधकाम ई. धोकादायक क्षेत्रात अपघाती आणि कामाशी संबंधित आजारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 30 लाख कामगारांचा मृत्यू होतो. तसेच कामाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. (26 लाख मृत्यू) कामाच्या ठिकाणी योग्य सोई-सुविधा नसल्यामुळे Circulatory Diseases , Malignant Neoplasms , Respiratory Diseases , Lung Cancer , Non-melanoma Skin Cancer , Asthma ई. भयावह आजार कामगारांना जडतात.  उपाय-योजनेबाबत - कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य सोई-सुविधा, आवश्यक असलेली अद्यायावत साधने/तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. अस्तित्वात असलेल्या कामगार हिताच्या कायद्यांची सक्षम अंमलबजावणी करणे, या शास...

61. विकासाच्या वाटेवरील भारत!

47 ला स्वतंत्र झालेल्या भारताला '26 नोव्हेंबर 1949' रोजी भारतीयांनी निर्मिलेल्या संविधानाने भारताला अन् भारतातील प्रत्येक नागरिकाला ' सार्वभौमत्व' प्राप्त करून दिले. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस चाललेल्या या संविधान निर्मितीच्या प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्याकरिता आणि संविधानाविषयी जनजागृती होण्याकरिता दरवर्षी 26 नोव्हेंबरला "संविधान दिनाचा" दर्जा देण्यात येतो. राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केलेत. हे मूलभूत हक्क सामान्य नागरिकांना कळावे याकरिता अगदी सोप्या भाषेत विश्लेषित केलेली मूलभूत हक्कांची मालिका मी प्रकाशित केली आहे. ( लेख क्रमांक 5/2 ते 9/1 ) हक्कांचा दावा करतेवेळी काही 'कर्तव्य' देखील पार पाडावी लागतात.  ' कलम 51 A अंतर्गत काही मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) निर्देशित केली आहे.' संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे; राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना/अनुसरण करणे; भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता कायम ठेवणे; देशाचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय सेवा बजावणे; धार्मिक...

59. विकासाच्या वाटेवरील भारत!

शाळेत शिकलेला 'अश्मयुगीन मानव' आपणास आठवत असेल. जो कंद-मुळे खायचा, दगडाची हत्यारे/साधने वापरायचा. अगदी साधे जीवन जगायचा. हळूहळू त्याच्या बुद्धीत विचारांनी जन्म घेतला. मानवी विवेकाच्या कक्षा रुंदावल्या अन् तंत्रज्ञानाच्या विकासाने गती पकडली. आज या मानवाचे स्वरूप बदललेय. 'हा डिजिटल मानव डिजिटल युगात जगायला लागला.' ऑक्सिजन इतकं महत्व इंटरनेटला मिळालं. काळानुरूप हे तंत्रज्ञान (Technology) अधिकच विकसित होत आहे. यातीलच एक विकसनशील प्रकार म्हणजेच " Artificial Intelligence (AI) ." थोडक्यात मानवाने निर्माण केलेला हा 'यांत्रिक मेंदूच'..! Robotics, Marketing, Gaming, Education, Health Care, National Security, Cyber Security ई. क्षेत्रात AI ने अनेक उल्लेखनीय कामे पार पाडली आहेत. नैतिकतेचा अभाव, बेरोजगारीत वाढ, पक्षपात (Bias) या AI तील त्रुटीही तितक्याच खऱ्या. AI चा तथा Deepfake चा उपयोग करून फोटो किंवा व्हिडिओ चे Morphing अथवा Editing केल्या जाते. थोडक्यात, महिलांच्या फोटो तथा व्हिडिओला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हर्च्युअली विवस्त्र केल्या जातं. प्रसिद्ध...

53. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! "जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।" यातूनच प्रेरणा घेत वर्षभरापूर्वी म्हणजेच दिनांक ' 02 OCTOBER 2022 ' रोजी "विकासाच्या वाटेवरील भारत!" या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. विविध संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक ई. विषयांवर मी अगदी मोजक्या शब्दांत लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब मला प्रेरणा देणारी ठरते. 'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा विरोधी भूमिका घेणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.' प्रकाशित लेखांबद्दल -  एका वर्षाच्या काळात सातत्याने प्रत्येक रविवार मी लेख प्रकाशित केलेत. या लेखाला गृहीत धरल्यास एकूण 53 ...

38. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण ' आधुनिक प्रेमाचे चक्र ' बघितले. ज्याची थोडी-बहुत कल्पना सर्वांनाच आली असेल. या लेखात आपण या चक्राची दाहकता समजून घेऊ... काही तरुण-तरुणी तथा विवाहित स्त्री-पुरुष एकाच वेळी अनेकांशी प्रेमात गुंततात आणि गुंतवतात. ज्याला 'Double Date, Affairs' अशी प्रचलित शब्द आहेत. याला खरच 'Modern' म्हणायचं का? हा मोठा प्रश्न... पुढे या प्रकरणांमध्ये कुणाला यश तर कुणाला अपयश येत. जे त्या चक्रात यशस्वी झालेत त्यांना तीच सवय जडते. प्रेमप्रकरणात अपयशी झालं की Blackmailing, Suicide , Acid Attacks, Sexual Harrasment, Rape, Murder, Divorce, Abortion, नग्न अवस्थेतील Photos, Videos खुलेपणाने Social Media वर प्रसारित केले जातात. देशातील निम्म्यापेक्षा अधिक तरुण-तरुणी यातच भरकटलेली दिसतात. प्रेमाला धार्मिकतेचा-जातीयतेचा आयाम देखील जोडला जात आहे. नुकतेच घडलेले 'दिल्लीमधील प्रकरण' आपण ऐकून असाल. इतक्या खालच्या थराला आपण हे प्रेम घेऊन आलोय.  गरज आहे ती सतर्कतेची, नैतिकतेची, खऱ्या प्रेमाच्या संकल्पना समजून घेण्याची... माझी सर्वच समाजघटकांना कळकळीची विनंती असेल, ...

37. विकासाच्या वाटेवरील भारत!

आज आपण सर्वांच्या आवडीच्या विषयावर अक्षरमांडणी करणार आहोत... 'प्रेमाच्या आधुनिक संकल्पना' हे उपशीर्षक या लेखासाठी साजेस ठरेल. माझ्या निदर्शनास आलेल्या अन् पुस्तकी जगातल्या प्रेमाची तुलना करण्याचा हा प्रयत्न. अनेक पुस्तकांत प्रेमाच्या विविध व्याख्या करण्यात आल्या आहेत. जसं, प्रेम म्हणजे निस्वार्थभाव, प्रेम म्हणजे आतुरता-ओढ, प्रेम म्हणजे शरीरसंबंध, प्रेम म्हणजे दया, प्रेम म्हणजे भावना इत्यादी इत्यादी इत्यादी... हेच प्रेम कुणी मनावर केलंय, कुणी सौंदर्यावर, कुणी शरीरावर, कुणी आठवणींवर, कुणी वस्तूंवर... प्रेम शोधायचं झालं तर ते भेटेल आई-वडिलांकडे, नात्यांमध्ये, मित्र-मैत्रिणींकडे अन् महत्वाचं म्हणजे प्रियकर-प्रेयसी मध्ये. ज्यांना आपण Boyfriend, Girlfriend अशा उपमा देतो. यांच्या प्रेमाच्या संकल्पना जरा वेगळ्याच. यांच्या प्रेमाची सुरुवात होते 'Attachment' ने. काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी हे तरुण-तरुणी प्रेमाचा आधार घेतात. हेतू साध्य झाला की ते प्रेमाला पूर्णविराम देतात. ज्याला आपण 'Breakup, Detachment' म्हणतो. तिथून पुढची सुरुवात होते 'Move On' ने. ते झाल...

36. विकासाच्या वाटेवरील भारत!

दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केलेली ही 'मूलभूत हक्कांच्या कलमांची' मालिका आज पूर्णत्वास नेत आहे. या विश्लेषणाची सुरुवात 'कलम 14' पासून करण्यात आली होती. दिनांक 28 मे 2023 रोजी महत्त्वाची तरतूद म्हणजेच ' कलम 32 ' चे थोडक्यात विश्लेषण सादर करण्यात आले. येणाऱ्या काळात परिस्थितीला अनुसरून काही तरतुदींचे विवेचन सादर करण्यास माझी तत्परता असेल. उर्वरित कलम 33, 34 आणि 35 तसेच इतर तरतुदींचा सखोल अभ्यास करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्यच ठरते. अनेकांच्या घरात हे संविधान गेलयं खर, पण ते वाचण्याचा त्यांना वेळच मिळेना... दैनंदिन जीवनातील थोडा जरी वेळ आपण संविधान वाचण्यात घालविला तर आपल्याला आपले हक्क-अधिकार कळतील. शासन कारभारात आपली काय भूमिका असावी हे समजेल. आणि निश्चितच आपली वाटचाल 'शासनकर्ती जमात' होण्याकडे असेल..! ~ सचिन विलास बोर्डे 9/1 Article 33 | Article 34 | Article 35 | Series Of Fundamental Rights NEXT 🔹 PREVIOUS

20. विकासाच्या वाटेवरील भारत!

'भारतीयांनो आपल्या हक्क-कर्तव्याची तुम्हालाही जान असू द्या...!' असा उद्घोष थेट मनातून लेखनामध्ये साकारत आहे. संविधानापासून दुरावणाऱ्या समाजाला संविधानाची, हक्क-कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न. संविधानाच्या 'भाग तीन' मध्ये काही मूलभूत हक्क अंतर्भूत करण्यात आले आहेत. ज्याबद्दल आपण 'ऐकून' आहात... 'सोशल मीडिया चा वेळ आम्ही वाचनात का व्यतीत करावा..?' ही आपली भूमिका. असो.. विश्लेषणाकडे लक्ष केंद्रित करूया... संविधान नागरिकांना समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्म स्वातंत्र्याचा, संस्कृती जपण्याचा, शिक्षणाचा इत्यादी व्यापक हक्क-अधिकार बहाल करते. त्यासंबंधी सखोल विश्लेषण कलमांद्वारे समजून घेणे महत्वाचे ठरते. जसे, ' कलम 14 राज्याची भूमिका स्पष्ट करताना दिसते. राज्याने भारताच्या राज्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कायद्यापुढे समान वागणूक द्यावी तथा कायद्याचे समान संरक्षण देखील करावे.' यातून समानतेच्या हक्कांची सुरुवात होते. या अनुच्छेदांची योग्य अंमबजावणी होतेय का?, आपणांस कायद्यापुढे समान वागणूक मिळतेय का?, कायद्याच...

6. विकासाच्या वाटेवरील भारत!

स्त्रीजीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक म्हणजेच मासिक पाळी ! खरेतर मासिक पाळी हा शब्द उच्चारणे लज्जास्पद नव्हे. हा एक साधा शरीरधर्म आहे. ह्या नैसर्गिक चक्राला आपण अंधश्रध्देचा आणि अपवित्रतेचा आयाम जोडलाय. मुळात हीच लाजिरवाणी बाब होय... महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे आपण, अशा गोष्टी आल्या की मात्र गप्प. मासिक पाळी दरम्यानच्या दिवसांत स्त्रियांना शारीरिक तथा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अलिखित सामाजिक बंदी असल्याने याविषयी चर्चा होत नाही. ' राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार ' भारतातील 64 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, 50 टक्के महिला कापडाचा वापर करतात. यात पुन्हा ग्रामीण आणि शहरी भागात तफावत दिसते. ग्रामीण क्षेत्रातील किशोरवयीन तरुणी आणि स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान वापरायची योग्य त्या साधनांची उपलब्धता / माहिती नसते. ज्यातून विवध आजारांना सामोरे जावे लागते... (उदा. Reproductive Tract Infections , Bacterial Vaginosis , Urinary Tract Infections , Pelvic Infections , Cervical Cancer ) भारतातील सुमारे 23 दशलक्ष मुली मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन ( MHM ) ...