139. विकासाच्या वाटेवरील भारत!

स्त्रियांच्या जीवनातला एक अविभाज्य नैसर्गिक शरीरधर्म म्हणजेच 'मासिक पाळी!' हा विषय अनेक वर्षे केवळ कुजबुजीपुरता मर्यादित राहिला. अलीकडच्या काही काळात या विषयावर थोडीबहुत चर्चा होताना दिसतेय.

(मासिक पाळीविषयक काही महत्त्वपूर्ण मुद्दे मी लेख क्र. 2/1 मध्ये मांडले होते. वाचकांनी तेही मुद्दे आवर्जून वाचावेत.)
आजच्या लेखातून मासिक पाळीविषयक अनेकदा चर्चेत येणाऱ्या रजेच्या मुद्द्याचा थोडक्यात आढावा घेऊया...

मासिक पाळीदरम्यानच्या कालावधीत संबंधित स्त्रीला चार ते पाच दिवसाची "मासिक पाळी रजा (Menstrual Leave)" मिळावी या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून दावे-प्रतिदावे मांडले जात आहेत. शिक्षण घेणाऱ्या मुली, खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रीया यांना चार दिवसांची रजा मिळायला हवी अशी मागणीही अनेकदा होते.

बिहार, केरळ, ओरिसा, सिक्कीम, कर्नाटक या राज्यांच्या शासन-प्रशासनाने अलीकडच्या काही काळात मासिक पाळीदरम्यान रजा/सुट्टी देणारी धोरणे राबविली आहेत.
काही खाजगी कंपन्याही या स्वरूपाच्या रजा देतात.
जपान, साऊथ कोरिया, इंडोनेशिया, झांबिया, तैवान इत्यादी देशांनी मासिक पाळीदरम्यानच्या रजेविषयीच्या तरदुती केल्या आहेत. मात्र भारतात अद्यापही या संबंधित विशेष कायदा/तरतुदी केल्या गेलेल्या नाहीत.

मासिक पाळी दरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या 'शारीरिक अन् मानसिक वेदना' लक्षात घेता स्त्रीयांना विश्रांतीसाठी चार दिवसांची रजा निश्चितच असायला हवी. रजा घ्यावी की नाही याची मुभा स्त्रियांना असायला हवी. म्हणजेच या रजेचे स्वरूप वैकल्पिक असायला हवे. अशा स्वरूपाचा धोरणात्मक तोडगा केंद्र आणि राज्यांच्या शासन-प्रशासनाने काढायला हवा. कारण महिलांच्या सुदृढ आरोग्याकडे दुर्लक्ष करून
'स्त्री सक्षमीकरणाचं' ध्येय गाठता येणारं नाही..!


~ सचिन विलास बोर्डे

32/4

Menstrual Leave | Menstruation | Menstrual Cycle | Periods | Health | Women Empowerment 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!