119. विकासाच्या वाटेवरील भारत!
नोव्हेंबर 2024 मध्ये UNICEF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा "The State of the World's Children 2024"
नामक अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालाने अधोरेखित केलेल्या काही ठळक बाबी आपण समजून घेऊया.
अहवालानुसार -
2050 या वर्षापर्यंत भारतात लहान मुलांची संख्या 35 कोटी असेल. इतर देशांच्या तुलनेत जागतिक पातळीवर भारताचा मुलांच्या लोकसंख्येतील वाटा 15 टक्के असेल. यामुळेच भारताला लहान मुलांच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.
पर्यावरण आणि हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर, शिक्षणावर आणि अन्न-पाण्यासारख्या जीवनावश्यक स्त्रोतांवर होतो. 2050 पर्यंत लहान मुलांना तीव्र हवामान आणि विविध पर्यावरणीय संकटाना सामोरे जावे लागेल तसेच 2000 च्या तुलनेत जवळपास आठ पट जास्त मुले अतिउष्णतेच्या लाटेला सामोरे जातील असेही हा अहवाल नमूद करतो.
आफ्रिकेसारख्या कमी संसाधने अन् कमी उत्पन्न असलेल्या देशांत पर्यावरणीय संकटाची तीव्रता अधिक असते.
अशा देशात सर्वाधिक मुलांची संख्या असेल. यामुळेच अशा देशांना तातडीने उपाय-योजना आखाव्या लागतील.
Children’s Climate Risk Index (CCRI) 2021 मध्ये भारत 163 देशांमध्ये 26 व्या स्थानी होता. भारतीय मुलांना अतिउष्णता, पुर, दुष्काळ, वायू प्रदूषण इत्यादी पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागतो. परिणामी भारतालाही सुदृढ उपाय-योजना आखाव्याच लागतील. कारण देशाचा सुदृढ विकास घडविण्यासाठी देशातील जनता सुदृढ असावी लागते..!
~ सचिन विलास बोर्डे
28/1
UNICEF | The State of the World's Children 2024 | Demographic Dividend | Children Future By 2050 | Population | Climate Change | Climate Crisis | Health | Children Safety | Environment | Pollution
Comments
Post a Comment