Posts

Showing posts with the label Demographic Dividend

119. विकासाच्या वाटेवरील भारत!

नोव्हेंबर 2024 मध्ये UNICEF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा " The State of the World's Children 2024 " नामक अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालाने अधोरेखित केलेल्या काही ठळक बाबी आपण समजून घेऊया. अहवालानुसार -  2050 या वर्षापर्यंत भारतात लहान मुलांची संख्या 35 कोटी असेल. इतर देशांच्या तुलनेत जागतिक पातळीवर भारताचा मुलांच्या लोकसंख्येतील वाटा 15 टक्के असेल. यामुळेच भारताला लहान मुलांच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.  पर्यावरण आणि हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर, शिक्षणावर आणि अन्न-पाण्यासारख्या जीवनावश्यक स्त्रोतांवर होतो. 2050 पर्यंत लहान मुलांना तीव्र हवामान आणि विविध पर्यावरणीय संकटाना सामोरे जावे लागेल तसेच 2000 च्या तुलनेत जवळपास आठ पट जास्त मुले अतिउष्णतेच्या लाटेला सामोरे जातील असेही हा अहवाल नमूद करतो. आफ्रिकेसारख्या कमी संसाधने अन् कमी उत्पन्न असलेल्या देशांत पर्यावरणीय संकटाची तीव्रता अधिक असते. अशा देशात सर्वाधिक मुलांची संख्या असेल. यामुळेच अशा देशांना तातडीने उपाय-योजना आखाव्या लागतील. Children’s Climate Risk Index (CCRI) 2021 मध्ये भारत 163 देशांमध्...

12. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसते. अन् यातून तरुण आत्महत्येचा वैफल्य मार्ग स्वीकारतो. याचे विविध मासले पहावयास मिळतात. या समस्येचे आकलन करून विविध सरकारी तथा गैर सरकारी आस्थापना आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात. "भारताची स्थिती" - ' नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो 'च्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार, 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 'राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाच्या' अहवालानुसार, 2020 ची आकडेवारी लक्षात घेता एकंदरीत आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये 71% पुरुष तर 29% महिलांचा समावेश आहे.  65% आत्महत्या 18-45 वयोगटातील आहेत. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेमप्रकरण, लग्नाशी संबंधित समस्या तथा इतर काही कारणांमुळे अनेकांनी आपले जीवित संपविलेले दिसते. "उपाययोजना" -   'मानसिक आरोग्य कार्यक्रमाची' आखणी करणे, शैक्षणिक स्तरावर मानसिक स्वास्थ्यासाठी अभ्यासक्रम सुरू करणे, समाज प्रबोधन, ‘ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम ’, ‘ नॅशनल पॅलिएटिव्ह केअर ...

8. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीने 800 कोटी लोकसंख्येचा पल्ला गाठलाय... सार्वजनिक आरोग्य, पोषण, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य औषधोपचार याचे हे फलित. लोकसंख्येचा थेट परिणाम त्या देशाच्या विकासाच्या प्रत्येक कांगाव्याशी निगडित असतो. परिणामी जेवढी लोकसंख्या अधिक तेवढा संसाधनांवरचा भार अधिक... म्हणजेच संसाधनांचा शाश्वत उपयोग करणे महत्वाचे. भारताचा 800 कोटीतील वाटा - 2022 मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे 141.2 कोटी आहे. 2025 सालापर्यंत चीनला मागे टाकत भारताची लोकसंख्या 166.8 कोटी तर चीनची 131.7 कोटी होईल. असे असले तरी कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढल्यामुळे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावत असल्याचा अंदाज ' संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने ' वर्तवलाय. उत्तम शिक्षण / साक्षरता, कुटुंबनियोजनाचे गांभीर्य, संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरण, पुढच्या पिढीचा विचार, तरुणांमध्ये कौशल्यांचा विकास, रोजगार निर्मिती, आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान इत्यादी मुद्द्यांवर व्यक्ती, समाज आणि शासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे. यातून एकंदरीतच राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला कमालीची गती प्राप...