120. विकासाच्या वाटेवरील भारत!
देशाच्या "राज्यघटनेच्या इतिहासाचा" थोडक्यात आढावा आजच्या लेखातून घेऊया.
1946 मध्ये लॉर्ड लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश असलेले 'कॅबिनेट मिशन' भारतात आले. कॅबिनेट मिशनने घटना समितीच्या निर्मितीचा आणि संरचनेचा आराखडा मांडला.
घटना समितीवरील सदस्यांची निवड प्रत्यक्ष मतदानाद्वारे झालेली नव्हती. हे सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडलेले आणि काही नियुक्त केलेले होते. घटना समितीची पहिली बैठक
9 ते 23 डिसेंबर 1946 या काळात पार पडली.
राज्यघटनेच्या निर्मितीची जबाबदारी पार पाडण्याकरिता घटना समितीने 22 समित्या स्थापन केल्या होत्या. यातील 7 सदस्य असलेली 'मसुदा समिती' ही अत्यंत महत्त्वाची समिती होती. जिचे अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर होते.
आंबेडकरांनी राज्यघटनेचा मसुदा प्रथम वाचनासाठी
04 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. मसुद्याच्या दुसऱ्या वाचनादरम्यान प्रत्येक कलमावर चर्चा केली गेली. यादरम्यान जवळपास 7635 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या त्यापैकी 2473 दुरुस्त्यांवर समितीने चर्चा केली. 14 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या मसुद्याचे तिसरे वाचन सुरू झाले. शेवटी आंबेडकरांनी राज्यघटनेच्या समंतीचा ठराव मांडला.
या ठरावावर अध्यक्षांनी स्वाक्षरी केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा मंजूर झाल्याचे घोषित करण्यात आले.
(क्रमशः)
~ सचिन विलास बोर्डे
28/2
History of the Constitution | Historical Background | Constituent Assembly | Making of the Constitution | Drafting Committee | Cabinet Mission
Comments
Post a Comment