56. विकासाच्या वाटेवरील भारत!

'बालविवाह' म्हणजेच समाजात रुजलेली मोठी समस्या. परंपरेचे अधिष्ठान देत, 18 वर्षे वय होण्याअगोदर मुला-मुलींना लग्नसंबंधात बंधिस्त केल्या जाते. कायद्याने यावर बंधने असली तरीही हा छुपा कारभार अनेक राज्यात पार पडतोय.

NFHS-5 आणि UNICEF नुसार आसाम, प. बंगाल, बिहार, त्रिपुरा, झारखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश ही राज्ये आघाडीवर.

आर्थिक तथा शैक्षणिक मागासलेपण, गरिबी, समाजातील श्रद्धा-रूढी-परंपरा, विवाहपूर्व लैंगिक संबंधांपासून संरक्षण ई. कारणांमुळे बालविवाह होतात. कुटुंबाचा भार कमी करण्यासाठी देखील मुलींची लग्न लावली जातात.
 
अधिकृत आकडेवारी - 
UNICEF नुसार एका वर्षात 18 वर्षाखालील 15 लाख मुलींचे बालविवाह होतात.
NFHS-5 (2019-21), 20 ते 24 वयोगटातील 23% स्त्रिया 18 वर्षे वयाच्या अगोदर विवाह करतात.

बालविवाहाची दाहकता -
घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, कमी वयात गर्भधारणा, 
शैक्षणिक वंचितता हे बालविवाहाचे फलित.

उपाययोजना -  
मदितीसाठी, तक्रारीसाठी 'Childline 1098' हा क्रमांक डायल करा.
Protection of Children from Sexual Offences Act, 2012; बेटी बचाओ, बेटी पढाओ' या कायद्यांची/धोरणांची योग्य अंमलबजावणी व्हावी. तसेच मुलामुलींना
'18 वर्षांपर्यंत सक्तीचे शिक्षण-नोकरी-त्यानंतर लग्नाचा विचार' ही सुधारकवृत्ती समाजाने आत्मसात करावी ही अपेक्षा बाळगत आजच्या लेखणीला पूर्णविराम देतो..!

~ सचिन विलास बोर्डे

13/4

Child Marriage | Child Rights | POCSO | NFHS | UNICEF 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!