57. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेखात आपण बालविवाहाबद्दल थोडक्यात आढावा घेतला. त्यात बालविवाहाची दाहकता समजून घेताना 'घरगुती हिंसाचाराचा' मुद्दा अधोरेखित केला होता. अगदी मोजक्या शब्दांत घरगुती हिंसाचार (Domestic Violence) समजण्यासाठी सदरील लेख प्रस्तुत करीत आहे.
'स्त्रीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आर्थिक
छळ/गैरवर्तन म्हणजेच घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचार होय.' मुख्यत्वे पती अथवा कुटुंबीय या छळास जबाबदार असतात.
हुंडा किंवा मालमत्तेसाठी, अपेक्षित अपत्य नसल्यामुळे तसेच पतीद्वारे नशिल्या पदार्थांच्या सेवनामुळे ही हिंसा घडून येते. यामध्ये स्त्रीला मारहाण करणे, जखमी करणे, शिवीगाळ-अपमानित करणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (बलात्कार) करणे आणि बऱ्याचदा स्त्रियांची हत्या देखील केली जाते. त्रासाला कंटाळून स्त्री स्वतः आत्महत्येचा मार्ग देखील अवलंबिते. आये दिन याविषयीचे वृत्त्त प्रकाशित होत असतात.
अधिकृत आकडेवारी -
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण(NFHS)-5 नुसार, देशातील 18 ते 49 वयोगटातील 30% महिला वयाच्या 15 वर्षापासून 'शारीरिक हिंसाचाराला' बळी पडल्या आहेत. तर 6% महिला त्यांच्या आयुष्यात एकदातरी 'लैंगिक हिंसेला' बळी पडल्या आहेत.
उपाययोजना -
राज्यघटनेच्या कलम 14 नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम 15 अन्वये स्त्री पुरुष समानता आणि कलम 21 अन्वये जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क महिलांनाही दिला आहे. या तरतुदींची आणि Protection of Women from Domestic Violence Act, 2005 या कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे ठरते..!
मदतीसाठी '7827170170' हा क्रमांक डायल करा. (राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन)
~ सचिन विलास बोर्डे
13/5
Domestic Violence | PWDV Act | National Commission for Women | NFHS | Women Empowerment
Comments
Post a Comment