55. विकासाच्या वाटेवरील भारत!
महिनाभरापूर्वी केंद्रशासनाने '4,100 कोटी' रुपये खर्च करून G20 ची बैठक पार पाडली. त्यानंतर भारत 'विश्वगुरू' होतो की काय? अशी चर्चा समाज माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये सुरू झाली.
अन् अलीकडेच "जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index 2023)" प्रकाशित झालाय. ज्याने विश्वगुरूच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे केलेत.
भारताची स्थिती -
125 देशांच्या यादीत भारताची '107 वरून 111 व्या स्थानी घसरण' झाली आहे. अहवालानुसार भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण झाली आहे. पाकिस्तान (102), बांगलादेश (81), नेपाळ (69), श्रीलंका (60)व्या स्थानी आहे.
भारतातील कुपोषणाचं प्रमाण हे तब्बल 16.6 टक्के इतकं असून पाच वर्षांखालील बालमृत्यूंचं प्रमाण 3.1 टक्के इतकं नोंद करण्यात आलं आहे. यातून हा निष्कर्ष काढता येईल की, भारतीय जनतेला अजूनही पुरेपूर अन्न मिळेना.
'अहवालातील त्रुटी शोधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या उपाय-योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासन-प्रशासनाने शोधाव्या अन् त्या दूर कराव्या.' जेणेकरून सामाजिक विकास गतिशिल होईल.
उपासमारीचे परिणाम तथा मागच्या वर्षीचा अहवाल
'लेख क्र. 1/5' मध्ये प्रकाशित केला आहे.
भारत बेरोजगारी, गरिबी, उपासमार, कुपोषण, बालमृत्यू यामध्ये अग्रक्रमावर राहिल्यास आपला भारत विश्वगुरू कसा होईल बरे..!
~ सचिन विलास बोर्डे
13/3
Global Hunger Index 2023 | Malnutrition | Hunger | GHI | Child Mortality | G20
Comments
Post a Comment