Posts

Showing posts with the label Malnutrition

108. विकासाच्या वाटेवरील भारत!

2027-28 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर, 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल अशी गृहितके देशातील राजकारणी अन् विविध अर्थतज्ञांनी मांडलेली आहेत. यातील काही गृहितके पूर्ण होतीलही. मात्र अर्थव्यवस्थेचा केवळ आकार वाढल्याने देशाचे मुख्य प्रश्न सुटत नाही हीच बाब नुकत्याच प्रकाशित झालेल्या यंदाच्या " जागतिक भूक निर्देशांकातून " अधोरेखित करता येईल. Global Hunger Index 2024 मध्ये भारताची स्थिती - 127 देशांच्या यादीत भारत 105व्या स्थानी आहे. भारताशेजारील देश पाकिस्तान 109, बांगलादेश 84, नेपाळ 68, श्रीलंका 56 व्या स्थानी आहे. भारतातील ' कुपोषणाचं प्रमाण 13.7 ' टक्के इतकं असून पाच वर्षांखालील ' बालमृत्यूचं प्रमाण 2.9 ' टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. थोडक्यात, भारतात भुकेचा प्रश्न चिंताजनक असल्याचं हा अहवाल अधोरेखित करतो. (2022 आणि 2023 मधील अहवालाचे विश्लेषण अनुक्रमे लेख क्र. 1/5 आणि लेख क्र. 13/3 मध्ये केले आहे. त्याचाही आढावा वाचकांनी जरूर घ्यावा.) भारताने भुकेचा अन् कुपोषणाचा प्रश्न सोडविण्याकरिता अनेक उपाय-योजना रा...

55. विकासाच्या वाटेवरील भारत!

महिनाभरापूर्वी केंद्रशासनाने '4,100 कोटी' रुपये खर्च करून G20 ची बैठक पार पाडली. त्यानंतर भारत 'विश्वगुरू' होतो की काय? अशी चर्चा समाज माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये सुरू झाली. अन् अलीकडेच "जागतिक भूक निर्देशांक ( Global Hunger Index 2023 )" प्रकाशित झालाय. ज्याने विश्वगुरूच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे केलेत.  भारताची स्थिती -  125 देशांच्या यादीत भारताची '107 वरून 111 व्या स्थानी घसरण' झाली आहे. अहवालानुसार भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण झाली आहे. पाकिस्तान (102), बांगलादेश (81), नेपाळ (69), श्रीलंका (60)व्या स्थानी आहे. भारतातील कुपोषणाचं प्रमाण हे तब्बल 16.6 टक्के इतकं असून पाच वर्षांखालील बालमृत्यूंचं प्रमाण 3.1 टक्के इतकं नोंद करण्यात आलं आहे. यातून हा निष्कर्ष काढता येईल की, भारतीय जनतेला अजूनही पुरेपूर अन्न मिळेना. 'अहवालातील त्रुटी शोधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या उपाय-योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासन-प्रशासनाने शोधाव्या अन् त्या दूर कराव्या.' जेणेकरून सामाजिक विकास गतिशिल होईल. उपासमारीचे परिणाम तथा मागच्या वर्षीचा अहवाल ...

9. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी आपण ' बालदिनानिमित्त ' विविध समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव केलायं. खरेतर ते योग्यच... पण भारताच्या विकासाला महत्वपूर्ण योगदान देत असणारे सर्वसामान्य लोक/समाज, अन् त्यांच्या वाटेला आलंय दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार... अन् यातून जन्म होतो कुपोषणाचा ! केवळ आणि केवळ पुरेसे व आवश्यक अन्नघटक न मिळाल्याने बालके कुपोषणाने ग्रासले जातात. गरिबी, अन्नाची कमतरता, माता व बालकांचे आरोग्य व पोषण संदर्भात माहितीची कमतरता आदी मुख्य कारणे कुपोषणास कारणीभूत असतात. ' NFHS-5 ' सर्वेक्षणानुसार, 57% पेक्षा अधिक महिला (वयोगट 15-49) आणि 67% पेक्षा अधिक मुले (06-59 महिने) अशक्तपणाने (Anemia) ने ग्रासलेले आहेत. कुपोषणामुळे स्वादुपिंड, यकृत, थायरॉइड, प्रतिकारशक्ती यांवर परिणाम तसेच श्वसनसंस्था यांचे रोग वाढतात. यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. सरकार ' एकात्मिक बालविकास कार्यक्रम , माध्यान्ह आहार योजना, पोषण अभियान ' यांसारखे कार्यक्रम राबवत असते. त्यावर अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली जाते. ' रोजगार हमी योजनेंतर्गत ' पालकांना आर्थ...

5. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताच्या विकासाच्या वाटचालीत उपासमार अथवा भुकेचा प्रश्न आणखी तीव्र होतांना दिसत आहे. नुकतेच जाहीर झालेला जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये 121 देशांमध्ये भारत 107व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (81), बांगलादेश (84), पाकिस्तान (99) आणि श्रीलंका (64) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचं यातून विशद होतं.. कोविडमुळे ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक झालेली दिसते. पुढच्या पिढीला योग्य पोषण मिळाले, तरच त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होतो.तीव्र कुपोषित बालकांमध्ये विविध आजारांनी बालमृत्यू होण्याचे प्रमाण नऊ पटींनी वाढते. विविध सरकारी सामाजिक आस्थापना देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी मोठी पाऊले उचलतात. ' एक देश, एक रेशन ' तथा इतर काही धोरणांची योग्यरीत्या अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरते. परिस्थिती स्वीकारून त्यावर सकारात्मक पद्धतीने प्रभावी उपाययोजना करणे अशी या संस्थेंची आणि सजाण नागरिक म्हणून आपली वैशिष्ट्ये असली पाहिजे... ~ सचिन विलास बोर्डे 1/5 Hunger | GHI | Malnutrition  NEXT 🔹 PREVIOUS