41. विकासाच्या वाटेवरील भारत!
सध्याची राजकीय परिस्थिती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी लेख सादर करीत आहे.
मानवाच्या ऐतिहासिक वर्तनाचा आढावा घेतल्यास एक बाब लक्षात येते. साधारणतः अश्मयुगाचा जर विचार केला तर त्यावेळी मानव जगण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होता.
पुढे मानवाच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा-भूक-वासना इत्यादींचा विकास होत गेला. या बाबी शमविण्यासाठी तो शक्य तेवढी नैसर्गिक साधने जमवायला लागला. ज्यांच्याकडे अधिक साधने होती तो व्यक्ती अथवा गट कमी संसाधने असणाऱ्या गटावर अधिपत्य/सत्ता गाजवायला लागला. अन् यातून जन्म झाला असमानतेचा. अर्थातच त्याठिकाणी राजकारण/सत्ताकारण सुरू झाले.
आज उत्तर-आधुनिक जगात आपण जगतोय. मानवाच्या गरजा देखील वाढल्या. अन् गरज पूर्तीसाठी, संरक्षणासाठी मानवाने एक प्रबळ राज्यसंस्था निर्माण केली. मात्र राज्यसंस्था केवळ सत्तेचा हाव असणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनली.
महाराष्ट्रातील राजकारण एक उत्तम उदाहरण ठरेल. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता प्रश्न पडतो, हा राजकीय गदारोळ खरच जनकल्याणासाठी आहे काय?
की केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हा खटाटोप सूरुय...
शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची/गुन्ह्यांची संख्या वाढतेय, बेरोजगारी, शिक्षणाचा दर्जा खालावतोय अशा कितीतरी डोईजड समस्या समोर आहेत अन् आपण राजकीय अस्थिरता निर्माण करतोय..!
गरज आहे ती प्रश्न उपस्थित करणाऱ्या, जाब विचारणाऱ्या विवेकी समाजाची..!
~ सचिन विलास बोर्डे
10/2
History | Politics | Politicians | Primitive Society | Post Modern Society
Comments
Post a Comment