15. विकासाच्या वाटेवरील भारत!

'बेरोजगार' हा शब्द पिढ्यान् पिढ्या अधिक व्यापक होत आहे. नुकताच 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)' चा अहवाल जारी करण्यात आलाय. त्यात असे प्रत्ययास येते की जानेवारी 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 6.56% नोंदवण्यात आला होता, तोच दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत पोहोचलाय. शहरी भागात हा दर 10%, तर ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.5% नोंदवण्यात आले.

क्षेत्रनिहाय बेरोजगारीचा विचार करता हरियाणा (36.4%) अग्रक्रमावर आहे, त्याखालोखाल राजस्थान (28.5%), दिल्ली (20.8%).
सोप्या भाषेत बेरोजगारीने पुन्हा शिखर गाठले...

ही बेरोजगारी अनेक समस्यांचा मूलाधार ठरते. त्याचा थेट परिणाम देशाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणावर होतो.

"बेरोजगारी का वाढते?" - 
शासन रोजगार निर्माण करण्यात असक्षम, तरुणांमध्ये कौशल्यांचा अभाव, लोकसंख्येच डोईजड ओझ, बँकांद्वारे व्यावसायिक कर्ज देण्यात दिरंगाई, Crony Capitalism, शासकीय ध्येय-धोरणांबद्दल माहितीचा अभाव इत्यादी कारणांमुळे बेकारी वाट्याला येते.

उपरोक्त कारणांचे सखोल आकलन केल्यास त्यातच उपाययोजना दडलेल्या दिसतात. सरकारी आणि खाजगी क्षेत्राने रोजगाराचा प्रबंध करणे महत्त्वाचे ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

4/2

Unemployment | CMIE | Employment Generation

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!