167. विकासाच्या वाटेवरील भारत!
लेख क्र. 38/2 मध्ये 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या' निवडणुकांचे महत्व आपण समजून घेतले होते.
त्यानंतर दोन डिसेंबरला महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुका कशा पार पडल्या याची चाचपणी आजच्या लेखातून करूया...
'मतदारांना पैशांचे वाटप, दुबार मतदार, आचारसंहितेचे उल्लंघन, हाणामारी, मतदान यंत्रात बिघाड, मतदान यंत्रांची तोडफोड' अशा वातावरणात लोकशाहीचा गाभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या.
मतदारांना मतदान केंद्राचा तपशील, तसेच आपल्या प्रभागातील अधिकृत उमेदवारांचा तपशील वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे जराही कष्ट राज्य निवडणूक आयोगाने घेतले नाही. या निवडणुका केवळ देखाव्यासाठी घेतल्या गेल्या असे प्रश्नचिन्ह उभे केले जाताय.
या निवडणुकांसंदर्भातील 'माझा व्ययक्तिक अनुभव' मी याठिकाणी नमूद करीत आहे. आमच्याकडे ऐनवेळेवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने नवीन मतदान यंत्रे सुरू केली गेली. मतदान झाल्यावर तातडीने बोटाची शाई पुसणारे दुबार मतदार दिसले. अशिक्षित, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी नेणारे सहाय्यक अधिकारीच झटपट मतदान यंत्रांची बटणे दाबताना दिसले. यामुळेच म्हणावा तितका 'सिरियसनेस' या निवडणुकांत मला जाणवला नाही.
अशा स्वरूपातले अनेक गैरप्रकार अनेक ठिकाणच्या प्रभागात दिसून आले आहेत. यामुळेच या निवडणुका होत्या की 'गैरप्रकारांची शर्यत', या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवे..!
~ सचिन विलास बोर्डे
39/1
Local Bodies Election | Election | Maharashtra | Maharashtra Election | State Election Commission | Local Self Government | Democracy | Municipal Corporations | Municipal Councils | Nagar Panchayats | Grassroot Democracy | EVM | Electoral Offences
Comments
Post a Comment