127. विकासाच्या वाटेवरील भारत!
धकाधकीच्या या स्पर्धात्मक युगात मानवाच्या जीवनात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसतेय. हेच नैराश्य डोईजड झालं की अनेकजण "आत्महत्येचा वैफल्य मार्ग" स्वीकारताना दिसताय.
"भारताची स्थिती" -
'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये 1.7 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 4.2 टक्क्यांनी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालेली दिसते. या जुन्या आकडेवारीवरून सध्याच्या परिस्थितीचे आकलन करता येईल.
गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेम-प्रकरणे, कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या अशा काही कारणांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे दिसते.
अलीकडे तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय?, आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण?, याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केलेत. मात्र यामुळे तरुणांमध्ये चुकीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता दिसतेय. 'आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात' हीच बाब मला या अनुषंगाने नमूद करावीशी वाटतेय.
"उपाययोजना" -
तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, ताणतणाव असेल, तुम्ही सतत चिंतेत अथवा नैराश्यात असाल तर या बाबी आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा. मित्र-मैत्रिणी, आई-वडील, Psychologists, Psychiatrists इत्यादींचा सल्ला घ्या. कारण 'चर्चेतूनच प्रश्न सुटतात.' ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी.
तसेच केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 'Tele-MANAS' नामक उपक्रम सुरू केलाय. ज्या अंतर्गत 14416 आणि 1800-891-4416 या दोन टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला मानसिक समुपदेशन मिळू शकते..!
~ सचिन विलास बोर्डे
30/1
Suicides In India | Youths | Mental Health | National Crime Records Bureau (NCRB) | Social Issues | Society | Awareness | Tele Mental Health Assistance and Networking across States (Tele MANAS) |
Comments
Post a Comment