117. विकासाच्या वाटेवरील भारत!
"आंबेडकर आंबेडकर आंबेडकर ही सध्या फॅशन बनलीय, त्याऐवजी एखाद्या देव-देवतेचं नामजप केलं तर सात जन्मे स्वर्ग लाभेल" अशा आशयाचे विधान 17 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं. विरोधी पक्षांकडून, विविध समाज संघटनांकडून या विधानाच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने होताहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यातील तथ्यांची तपासणी आपण आजच्या लेखातून करूया.
आंबेडकरांचा वेळोवेळी 'शाब्दिक आणि प्रतीकात्मक अपमान' होत आलाय. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अवमानकारक विधान अन् 'परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड' ही अनुक्रमे शाब्दिक आणि प्रतीकात्मक अपमानाची ताजी उदाहरणे आहेत.
समाजातील स्वार्थी नेतेमंडळी असतील किंवा विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे त्यांच्या फायदाकरिता आंबेडकरांना अथवा इतर थोर व्यक्तींना चर्चेचा विषय बनवतात. ही नेतेमंडळी आपल्या हितासाठी 'थोर व्यक्तिमत्त्वांची, संताची, महापुरुषांची' त्यांना हवी तशीच मांडणी करतात.
कुठलातरी नेता कुठल्यातरी थोर व्यक्तिमत्वाबद्दल संकुचित वक्तव्य करतो. आणि आपणही डोळेझाकपणे त्याला समंती देत असू, तर ही आपली 'मानसिक मागासतेची' लक्षणेच म्हणावी लागतील.
असो, आंबेडकरांचा अवमान करणे हीच सध्या फॅशन बनलीय. याच फॅशनला गृहमंत्र्यांचा विरोध असायला हवा होता. कोणास ठाऊक देव-देवतेचं नामजप केल्याने सात जन्मे स्वर्ग मिळेल की नाही पण "आंबेडकर आंबेडकर आंबेडकर अन् संविधान संविधान संविधान" हा जप केल्याने तुम्ही नक्की शिक्षित व्हाल अन् तुम्हाला तुमचे हक्क-अधिकार तरी मिळतील. हीच बाब गृहमंत्र्यासमवेत देशातील प्रत्येक नागरिकाने लक्षात घ्यावी..!
~ सचिन विलास बोर्डे
27/4
Dr. Babasaheb Ambedkar | Protest | Parliament | Winter Session | Rajya Sabha | Union Home Minister | Politics | Politicians | Constitution | Parbhani Violence |
Comments
Post a Comment