100. विकासाच्या वाटेवरील भारत!
बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढेलत आणि या प्रकरणांची कारवाई करण्यात विलंब का होतोय या दोन प्रश्नांचे विश्लेषण आपण मागील लेखात बघितले. आजच्या लेखात उर्वरित दोन प्रश्नांचे विश्लेषण करूया...
1. बलात्काराची प्रकरणे कशी थांबवता येतील?
भारतामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराची समस्या ही काही नवी नाही. इतिहासकाळापासून "पितृसत्ताक/पितृप्रधान/Patriarchy" व्यवस्थेने पुरुषी वर्चस्व कायम राखण्याकरिता स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं. यातून 'स्त्रियांना पुरुषी लालसा भागविणारी गुलाम, आणि मुलांना जन्म देणारे केवळ एक साधन' मानले जाणारा विचार समोर आला. अन् हाच विचार आजही या समाजात टिकून आहे हे खैरलांजी, निर्भया, हैदराबाद, उज्जैन, मणिपूर, कोलकता अशा कित्येक प्रकरणांतून लक्षात येत.
लगेचच कठोर कायदे करून लगेचच हा समाज बदलणार नाही. जोवर हा वर्चस्ववादी विचार अन् ही वर्चस्ववादी मानसिकता बदलणार नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबणार नाही.
2. यावर उपाय-योजना काय?
उपोरोल्लेखित 'विकृत मानसिकता' बदलण्यास बराच काळ जावा लागणार आहे. मात्र शासन-प्रशासनाच्या पुढील कृतींतून या गुन्हेगारीला आळा घालता येऊ शकतो.
अशा गुन्ह्यांना फुटकळ शिक्षेऐवजी कठोर शिक्षेची तरतूद करावी. कायद्याचं भय गुन्हेगारांत असायलाच हवं. सोबतच प्रशासनातील दोष/भ्रष्टपणा दूर करून ही प्रकरणे तातडीने निकालात काढावी. शासन-प्रशासनाने अश्लील चित्रफितींचा (Pornography) प्रसार थांबण्याकरिता तातडीने योग्य कार्यवाही हाती घ्यावी. तसेच येणाऱ्या पिढीची नैतिक जडणघडण होण्याकरिता "नैतिक शिक्षणावर" जास्तीचा भर दिला जावा. जेणेकरून ही विकृत मानसिकता टप्प्याटप्प्याने संपुष्टात येईल.
आपण सगळे मिळूनच या वर्चस्ववादी/विकृत मानसिकतेचा त्याग करूया अन् समस्येचं समूळ उच्चाटन करूया..!
~ सचिन विलास बोर्डे
23/4
Kolkata | R. G. Kar Hospital | Doctors Protest | Crimes Against Women | Root Cause Of Rape Cases | Delay In Justice | Women Safety | Women Empowerment | Patriarchy | Social Issues | Society | Equality
Comments
Post a Comment