Posts

Showing posts with the label Result

138. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.  उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात य...

136. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) द्वारे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! अन् जे या स्पर्धेत येऊ इच्छितात, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्याकरिता पैसा आवश्यकच. म्हणून पुरेस शिक्षण घेता येईल इतकी शिक्षणाकरिता आर्थिक तरतूद करूनच ठेवावी. यंदाचा निकालात ' शेतकऱ्यांची मुले, कामगारांची मुले, रिक्षा चालकांची मुले, मेंढपाळांची मुले या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात मग आपण का नाही, ' याच विचाराकडे अनेक विद्यार्थी अन् पालकांचे दिल खेचले गेले. या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता समजण्याकरिता पुढील आकडेवारी नमूद करीत आहे. आयोगानुसार, या परिक्षेकरिता 9,92,599 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,83,213 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,62...

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...

82. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! मात्र जे या स्पर्धेत अपयशी ठरलेत, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात मोठ्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्यासाठी पैसा तर लागणारच, त्यासाठी पैसा जमवून ठेवणे इष्टच. शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक ठरते. क्लासेस लावलेले असो वा नसो UPSC सर्वांनाच समान संधी देते. यामुळेच निकालपत्रात क्लासेस लावलेले अन् न लावलेले दोन्ही विद्यार्थी झळकतात. आयोगानुसार, गतसाली या परिक्षेकरिता 10,16,850 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,92,141 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,624 उमेदवार मुख्य (लेखी) परीक्षेस पात्र ठरले. शेवटी 2,855 उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी / Personality Test पार पडल्यावर 1016 उमेदवारांची अंतिम निकालपत्र...