62. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच तब्बल 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 'कामगारांना' सुरक्षितपणे बाहेर काढण्यात विविध आस्थापना यशस्वी ठरल्यात. हे उल्लेखनीयच. ही घटना कामगारांच्या स्थितीविषयक अनेक प्रश्न उपस्थित करते.

सदरील लेखात 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने / International Labour Organization (ILO)' प्रकाशित केलेल्या अहवालाचा आधार घेत, कामगारांच्या स्थितीचे विश्लेषण करीत आहे.

अहवालानुसार, विविध खाणी, उत्खनन, बांधकाम ई. धोकादायक क्षेत्रात अपघाती आणि कामाशी संबंधित आजारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 30 लाख कामगारांचा मृत्यू होतो. तसेच कामाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. (26 लाख मृत्यू)

कामाच्या ठिकाणी योग्य सोई-सुविधा नसल्यामुळे Circulatory Diseases, Malignant Neoplasms, Respiratory Diseases, Lung Cancer, Non-melanoma Skin Cancer, Asthma ई. भयावह आजार कामगारांना जडतात. 

उपाय-योजनेबाबत -
कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य सोई-सुविधा, आवश्यक असलेली अद्यायावत साधने/तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. अस्तित्वात असलेल्या कामगार हिताच्या कायद्यांची सक्षम अंमलबजावणी करणे, या शासनव्यवस्थेच्या जबाबदाऱ्या ठरतात.

काम करतेवेळी आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांचा उपयोग करणे, कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमावलीचे पालन करणे तसेच राज्य आणि केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या ध्येय-धोरणे-कायद्यांविषयी जागरूक असणे या जबाबदाऱ्या कामगारांनी पार पाडणे अतिमहत्त्वाचे ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

15/1

Labours | Worker's Safety & health | International Labour Organization (ILO) | Awareness  

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!