61. विकासाच्या वाटेवरील भारत!
47 ला स्वतंत्र झालेल्या भारताला '26 नोव्हेंबर 1949' रोजी भारतीयांनी निर्मिलेल्या संविधानाने भारताला अन् भारतातील प्रत्येक नागरिकाला 'सार्वभौमत्व' प्राप्त करून दिले.
2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस चाललेल्या या संविधान निर्मितीच्या प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्याकरिता आणि संविधानाविषयी जनजागृती होण्याकरिता दरवर्षी 26 नोव्हेंबरला "संविधान दिनाचा" दर्जा देण्यात येतो.
राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केलेत.
हे मूलभूत हक्क सामान्य नागरिकांना कळावे याकरिता अगदी सोप्या भाषेत विश्लेषित केलेली मूलभूत हक्कांची मालिका मी प्रकाशित केली आहे. (लेख क्रमांक 5/2 ते 9/1)
हक्कांचा दावा करतेवेळी काही 'कर्तव्य' देखील पार पाडावी लागतात.
'कलम 51 A अंतर्गत काही मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) निर्देशित केली आहे.'
संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे; राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना/अनुसरण करणे; भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता कायम ठेवणे; देशाचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय सेवा बजावणे; धार्मिक,भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेद नाकारत बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे; सांस्कृतिक वारशाचे जतन करणे; पर्यावरणाचे संरक्षण, प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे; वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद अंगीकारणे; सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, हिंसाचाराचा त्याग; राष्ट्राच्या विकासात योगदान देणे; 6 ते 14 वर्षांदरम्यान आपल्या पाल्यास शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे माता-पित्याचे कर्तव्य असेल.
उपरोल्लेखित कर्तव्ये प्रत्येक नागरिकाने पार पाडावी अशी आकांक्षा मनी बाळगत आजच्या लेखाला पूर्णविराम देतो.
जय भारत, जय संविधान..!
~ सचिन विलास बोर्डे
14/4
Constitution | Constitution Day | Fundamental Rights | Fundamental Duties | Article 51A | Awareness
Comments
Post a Comment