Posts

Showing posts with the label Article 51 A

61. विकासाच्या वाटेवरील भारत!

47 ला स्वतंत्र झालेल्या भारताला '26 नोव्हेंबर 1949' रोजी भारतीयांनी निर्मिलेल्या संविधानाने भारताला अन् भारतातील प्रत्येक नागरिकाला ' सार्वभौमत्व' प्राप्त करून दिले. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस चाललेल्या या संविधान निर्मितीच्या प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्याकरिता आणि संविधानाविषयी जनजागृती होण्याकरिता दरवर्षी 26 नोव्हेंबरला "संविधान दिनाचा" दर्जा देण्यात येतो. राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केलेत. हे मूलभूत हक्क सामान्य नागरिकांना कळावे याकरिता अगदी सोप्या भाषेत विश्लेषित केलेली मूलभूत हक्कांची मालिका मी प्रकाशित केली आहे. ( लेख क्रमांक 5/2 ते 9/1 ) हक्कांचा दावा करतेवेळी काही 'कर्तव्य' देखील पार पाडावी लागतात.  ' कलम 51 A अंतर्गत काही मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) निर्देशित केली आहे.' संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे; राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना/अनुसरण करणे; भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता कायम ठेवणे; देशाचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय सेवा बजावणे; धार्मिक...