12. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसते. अन् यातून तरुण आत्महत्येचा वैफल्य मार्ग स्वीकारतो. याचे विविध मासले पहावयास मिळतात.

या समस्येचे आकलन करून विविध सरकारी तथा गैर सरकारी आस्थापना आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात.

"भारताची स्थिती" -
'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार, 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे.
'राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाच्या' अहवालानुसार, 2020 ची आकडेवारी लक्षात घेता एकंदरीत आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये 71% पुरुष तर 29% महिलांचा समावेश आहे. 
65% आत्महत्या 18-45 वयोगटातील आहेत.

गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेमप्रकरण, लग्नाशी संबंधित समस्या तथा इतर काही कारणांमुळे अनेकांनी आपले जीवित संपविलेले दिसते.

"उपाययोजना" - 
'मानसिक आरोग्य कार्यक्रमाची' आखणी करणे, शैक्षणिक स्तरावर मानसिक स्वास्थ्यासाठी अभ्यासक्रम सुरू करणे, समाज प्रबोधन, ‘नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम’, ‘नॅशनल पॅलिएटिव्ह केअर प्रोग्राम’, ‘आयुष्मान भारत’ आणि ‘नशा मुक्ती अभियान टास्क फोर्स’ असे अनेक राष्ट्रीय उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी महत्वाची ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

3/3

Suicides In India| Demographic Dividend | Youths 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!