Posts

Showing posts with the label DEC22

13. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 डिसेंबर अर्थातच शेतकरी दिवस. भारतभर या दिवशी शुभेच्छावर्षाव होतो. विविध माध्यमातून शेतकऱ्यांना धन्यवाद देण्याचा हा प्रयत्न. हा एक आयाम, अन् तितक्याच कटाक्षाने दुसऱ्या आयामांकडे लक्ष देणे महत्वाचे. दुसऱ्या आयामांचा विचार करता असे लक्षात येते की, कर्जबाजारीपणा, गरिबी, उपासमार, मानसिक तणाव, आत्महत्या ह्या समस्येचं डोईजड ओझ घेऊन शेतकरी जगतोय. सुख-समृद्धी त्याच्यासाठी काल्पनिकच..! "शेतकऱ्याची स्थिती" - नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. गेल्या वर्षभरात जवळपास 10 हजार 881 शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केलीय. बाजार समिती मधल्या दलालांकडून होणारी पिळवणूक, बँकद्वारे कर्ज देण्यात दिरंगाई, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांमधील महागाई इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याच्या वाटेला ह्या समस्या आलेल्या दिसतात. "उपाययोजना" - शेतकऱ्यांना पीक/आधुनिक तंत्रज्ञान/हवामान/ खते, बी-बियाणे याबद्दल पुरेशी माहिती देणे.  शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य...

12. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसते. अन् यातून तरुण आत्महत्येचा वैफल्य मार्ग स्वीकारतो. याचे विविध मासले पहावयास मिळतात. या समस्येचे आकलन करून विविध सरकारी तथा गैर सरकारी आस्थापना आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात. "भारताची स्थिती" - ' नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो 'च्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार, 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 'राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाच्या' अहवालानुसार, 2020 ची आकडेवारी लक्षात घेता एकंदरीत आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये 71% पुरुष तर 29% महिलांचा समावेश आहे.  65% आत्महत्या 18-45 वयोगटातील आहेत. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेमप्रकरण, लग्नाशी संबंधित समस्या तथा इतर काही कारणांमुळे अनेकांनी आपले जीवित संपविलेले दिसते. "उपाययोजना" -   'मानसिक आरोग्य कार्यक्रमाची' आखणी करणे, शैक्षणिक स्तरावर मानसिक स्वास्थ्यासाठी अभ्यासक्रम सुरू करणे, समाज प्रबोधन, ‘ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम ’, ‘ नॅशनल पॅलिएटिव्ह केअर ...

11. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्लीचा समाज गुंतलाय सण-समारंभ-जयंत्या पार पाडण्यात. यात काही वावगे नाही. पण हे कितपत योग्य याची चाचपणी होणेही महत्त्वाचे..! दुसऱ्या बाजूला विविध पदे तथा उच्चपदे भूषविणारे विचारशील प्राणी. त्यांना खरेच विचारशील म्हणावे का हा मोठा प्रश्न. ते केवळ आपल्या हितासाठी 'थोर व्यक्तिमत्त्वांची, संताची, महापुरुषांची' हवी तशीच मांडणी करतात. व्यापक विचार असलेल्या महापुरुषांना संकुचित चौकटीत जखडून ठेवतात. "महापुरुषांचा पराभव त्यांच्या विरोधकांकडून अथवा शत्रूच्या हातून नव्हे, तर अंधानुकरण करणाऱ्या त्यांच्याच अनुयायांकडून होतो" याचाच पुरेपूर फायदा उचलण्याचे काम राजकारणी तथा इतर समाजघटक करतात. कुठलातरी नेता कुठल्यातरी थोर व्यक्तिमत्वाबद्दल संकुचित वक्तव्य करतो. आणि आपणही डोळेझाकपणे त्याला समंती देतो, ही मानसिक मागासतेची लक्षणेच म्हणावी लागतील..! भारतीय समाजानेही ह्या महापुरुषांची वाटणी करून घेतलीय. 'हे आमचे ते तुमचे' माझा तरुणांना आणि एकंदरीत भारतीय समाजाला प्रश्न असेल, आपण महापुरुषांना जयंती, सण-समारंभ, पुण्यतिथी, स्मारके येवढ्या पुरतेच मर्यादित का ठेवतोय? होऊ द्या विचारा...

10. विकासाच्या वाटेवरील भारत!

एड्स बद्दल जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 01 डिसेंबर म्हणजेच ' जागतिक एड्स दिन ' साजरा करण्यात येतो. विविध माध्यमातून विषाणूसंसर्ग शरीरात पसरतात. फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचवतात, तेव्हा या स्थितीला आपण एड्स म्हणू शकतो! " एचआयव्ही झालायं म्हणजेच एड्स झालाच अस नव्हे" - एचआयव्ही आणि एड्स यातली तफावत समजून घेणे गरजेचे. काही लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात, परंतु त्यांना एड्स नसतो. ते सामान्य आयुष्य जगू शकतात. "भारताची स्थिती" -   23.49 लाख लोक एचआयव्ही च्या विळख्यात सापडलेले दिसतात (2019). 2010 ची तुलना करता यामध्ये 37% ने घट झालेली दिसते. भारतामधे एचआयव्ही चा प्रसार असुरक्षित लैंगिक तथा समलैंगिक संबंध आदी मुख्य कारणांमुळे होतो. 15 ते 49 वयोगटात याचे प्रमाण अधिक. उपाययोजना -  'राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था ( NACO ), राज्य पातळीवर एड्स नियंत्रण संस्था ( SACS ), राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम ( NACP )' ह्या सरकारी योजना/आस्थापना याविषयीची दाखल घेत असतात.  योग्य उपचार ( अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी -...