131. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी स्टँड-अप कॉमेडियन 'कुणाल कामराने' महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीविषयी व्यंगात्मक गीत गायले. ज्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर राज्यभर वादविवाद सुरू झाले. कार्यक्रमस्थळाची तोडफोडही केली गेली.
या घटनेमुळे "भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य" पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. याच अधिकाराचे विश्लेषण करण्याकरिता सदरील लेख प्रकाशित करीत आहे.

राज्यघटनेच्या "कलम 19(1)(a)" नुसार, नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती (Freedom of Speech and Expression) यांचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विविध न्यायालयीन निकालानंतर या तरतुदीची व्याप्ती वाढलेली दिसते.
उदा. इंटरनेट वर आपले मत व्यक्त करणे, व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करणे, मुद्रणाचे स्वतंत्र इत्यादी कालसुसंगत हक्क या तरतुदीत समाविष्ट झालेले दिसतात.

बोलण्याचे, लिहिण्याचे, प्रकाशनाचे, माहितीच्या देवाणघेवाणीचे, आपले विचार (Thoughts),
मते (Opinion) अन् कल्पना (Ideas) मांडण्याचे व्यापक अधिकार या कलमांतर्गत समाविष्ट होतात. शासनावर टीका-टिप्पणी करण्याचा अधिकारही याच तरतुदीअंतर्गत विचारात घेता येतो.

या अधिकारावर काही 'वाजवी निर्बंध (Reasonable Restrictions)' असल्याचेही राज्यघटनेने अधोरेखित केलेले दिसते. भारताची सार्वभौमता आणि एकता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी, न्यायालयाचा अवमान, अब्रुनुकसानी किंवा अपराधास चिथावणी या कारणांमुळे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रास्त निर्बंध घातले जाऊ शकतात..!

~ सचिन विलास बोर्डे

30/5

Kunal Kamra Controversy | Article 19(1)(a) | Freedom of Speech and Expression | Rights | Constitution | Fundamental Rights | Article 19 | Polity 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!