132. विकासाच्या वाटेवरील भारत!

पृथ्वीच्या वातावरणात 21% ऑक्सिजन असल्याचं विज्ञान सांगत. मानव-प्राण्याच्या अस्तित्वासाठी हा ऑक्सिजन वायू अत्यंत महत्त्वाचा. ऑक्सिजनच्या निर्मितीत
"जंगले/वने/Forest" मोठी भूमिका बजावतात.
झाडे, वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषतात अन् ऑक्सिजन बाहेर सोडतात.

थोडक्यात, वनांनी मानवाच्या उत्क्रांतीत 'प्राणवायूची भूमिका' बजावली. श्वास घेण्यासाठी प्राणवायू पुरवला, पोटाची भूक शमविण्यासाठी फळे पुरविली. (वनांनी केलेल्या या उपकाराच्या जाणीवेतूनच वनांची पूजा (Worship) आजही अनेक ठिकाणी केली जाते.)

इतिहासकाळातील मानवाकडे मर्यादित गरजा अन् अमर्याद संसाधने होती. आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना लोकसंख्येत वाढ होत गेली मात्र संसाधनांची त्यातुलनेत वाढ झाली नाही. परिणामी 'अमर्याद गरजा अन् मर्यादित संसाधने' हा पेचप्रसंग निर्माण झाला. हा पेच सोडविण्याकरिता अन् मानवी गरजा पूर्ण करण्याकरिता आधुनिक मानवाने यंत्र-तंत्राच्या विकासावर भर दिला.

यंत्र-तंत्राच्या विकासातून मोठ-मोठे शहरे विकसित झाली.
या शहरांत गरजा भागविणारे उद्योग, कारखाने, कंपन्या स्थापन झाल्या. मात्र 'मानवाची एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होते अथवा ती निर्माण केली जाते.' परिणामी मानवी गरजा निर्माण होत राहतील अन् गरजा भागविणारे उद्योग, कारखाने, कंपन्याही निर्माण होतच राहतील.

आता शहरे माणसांनी, उद्योगांनी, कारखान्यांनी, कंपन्यांनी भरगच्च भरलीय. नवीन उद्योगांच्या स्थापनेसाठी जंगले/वने तोडले जाताय. निसर्गापासून तुटलेला हा आधुनिक मानव ऑक्सिजन ऐवजी स्वार्थावर जगायला लागलाय.

जर मानवाने निसर्गाशी सहअस्तित्व नाकारले तर हा मानवी अस्तित्वाचाच शेवट असेल..!

~ सचिन विलास बोर्डे

31/1

Forest | Deforestation | Development | Oxygen | Carbon Dioxide | Human Existence | Natural Resources | Environment | Geography

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!