103. विकासाच्या वाटेवरील भारत!
देशातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल "अभियांत्रिकी (Engineering)" शिक्षणाकडे राहिलेला आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधित आकडेवारीवरून, बहुतांश विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा 'संगणक शाखेकडे' असल्याचे दिसते.
कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी या शाखांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिसून येते. त्याखालोखाल मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी चा पर्याय निवडला जातो.
आयटी क्षेत्रात मोठं पॅकेज अन् नोकरीच्या व्यापक संधी मिळतील या आशेने विद्यार्थी संगणक शाखेकडे (हार्डवेअर ऐवजी सॉफ्टवेअरकडे) वळतात.
हे विद्यार्थी भारतातच शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्ये विकसित करतात मात्र भारतात आवश्यक त्या नोकरीच्या संधी नसल्याने परदेशात नोकरीचा पर्याय निवडतात. परिणामी त्यांच्या बुद्धिमत्तेचा इतर देशांना फायदा होतो. शेवटी हे भारतीय त्या देशातच स्थायिक होतात.
संगणक शाखेच्या मृगजळाकडे अनेकजण आकर्षित झाल्याने इतर अभियांत्रिकी शाखांमध्ये तुटवडा निर्माण होत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रातले अभियंते (Engineers) मुबलक प्रमाणात असायला हवे.
इतर अभियांत्रिकी शाखांकडे विद्यार्थी वळण्याकरिता शासनाने योग्य नियोजन आणि पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण करणारे धोरणे आखायला हवे. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमही अद्ययावत असायला हवे. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टपणेलाही आळा घालावा लागेल. शिक्षणव्यवस्थेतून 'गुणवत्तापूर्ण अभियंते' बाहेर पडायला हवे.
कारण सर्व क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि भ्रष्ट नसलेले अभियंतेच 'देशाच्या विकासाच्या इंजिनला' गती देतील..!
~ सचिन विलास बोर्डे
24/3
Admission in Engineering | Software Engineers | Computer Science | Electronics & Telecommunication | Information Technology | Artificial Intelligence | Data Science | Cyber Security | Mechanical Engineering, Civil Engineering, Electrical Engineering | Education | Career | Employment
Comments
Post a Comment