Posts

Showing posts with the label Career

138. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.  उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात य...

104. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण अभियांत्रिकी शाखेविषयी माहिती घेतली. या लेखात आपण वैद्यकीय शिक्षणाविषयक स्थितीचा आढावा घेऊ. इतर क्षेत्रांच्या तुलनेत " वैद्यकीय शिक्षण (Medical Education) " कडे विद्यार्थ्यांचा कल अत्यंत कमी. यांस कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा ' पैसा '. अनेकांची खाजगी महाविद्यायात लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याने विद्यार्थी या क्षेत्रात येण्याचे टाळतात. सरकारी वैद्यकीय महाविद्यायात तुलनेने खर्च कमी असतो, मात्र इथे असणाऱ्या स्पर्धेत काहीजणच यशस्वी होतात. डॉक्टर होण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांची मोठी रक्कम खर्च होते. हीच रक्कम परत मिळविण्याकरिता अन् धनसंपन्न होण्याकरिता ही नव-शिक्षित मंडळी प्रामुख्याने शहरांमध्ये आपले इस्पितळे उघडतात. यामुळेच मोठ-मोठ्या शहरांत मोठ-मोठी फी/Fee असलेल्या मोठ-मोठ्या दवाखान्याच्या इमारती बघायला मिळतात. तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तुम्ही या मोठ-मोठ्या इस्पितळात तुमच्या दुखण्याचा इलाज करू शकता, अन् तुमच्याकडे पैसाच नसेल तर ' सरकारी डॉक्टर्स ' अन् ' सरकारी इस्पितळे...

103. विकासाच्या वाटेवरील भारत!

देशातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल " अभियांत्रिकी (Engineering) " शिक्षणाकडे राहिलेला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधित आकडेवारीवरून, बहुतांश विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा ' संगणक शाखेकडे ' असल्याचे दिसते. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी या शाखांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिसून येते. त्याखालोखाल मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी चा पर्याय निवडला जातो. आयटी क्षेत्रात मोठं पॅकेज अन् नोकरीच्या व्यापक संधी मिळतील या आशेने विद्यार्थी संगणक शाखेकडे (हार्डवेअर ऐवजी सॉफ्टवेअरकडे) वळतात. हे विद्यार्थी भारतातच शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्ये विकसित करतात मात्र भारतात आवश्यक त्या नोकरीच्या संधी नसल्याने परदेशात नोकरीचा पर्याय निवडतात. परिणामी त्यांच्या बुद्धिमत्तेचा इतर देशांना फायदा होतो. शेवटी हे भारतीय त्या देशातच स्थायिक होतात. संगणक शाखेच्या मृगजळाकडे अनेकजण आकर्षित झाल्याने इतर अभियांत्रिकी शाखांमध्ये तुटवडा निर्माण होत आहे. देशाच्या सर्वा...

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...