92. विकासाच्या वाटेवरील भारत!

सर्वप्रथम 'भारतीय क्रिकेट संघाचे' अभिनंदन!
काल झालेल्या 'टी-20 विश्वचषकाच्या' अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. हा विजय भारतासाठी आणि भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

भारताने क्रीडा क्षेत्रात घडविलेल्या या सर्वोत्तम कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते. भारत क्रीडा क्षेत्रात पुरेसा विकास घडवीत आहे या दृष्टीने इतर देश भारताकडे पाहू लागतात.

अलीकडच्या काळात 'क्रिकेट' सारख्या मैदानी खेळांबरोबरच 'बुद्धिबळासारख्या' बैठे खेळातही भारताने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली दिसते.

या खेळांत सहभागी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करतात. विविध देश या खेळांत सहभागी होतात. परिणामी 'जागतिक राजकारणात' विविध देशांशी 'आंतरराष्ट्रीय संबंध' वाढीस लागण्यास हे खेळ उपयुक्त ठरतात.

या स्पर्धात्मक खेळांना मनोरंजनापुरते सीमित न करता यातून अनेक बाबी आपण शिकायला हव्या. उदा, क्रिकेट मध्ये साधारणतः 11 खेळाडूंचा गट असतो. त्यांच्या सामूहिक प्रयत्नावरच त्या गटाचे यश-अपयश अवलंबून असते. यातून ऐक्य/एकोपा/एकजूटपणा/संघटन हे तत्त्व अधोरेखित होते. म्हणजेच 'ऐक्याने केलेल्या कुठल्याही कृतीच्या यशाची शक्यता अधिक असते.' बुद्धिबळाच्या खेळातून 'उपलब्ध पर्यायातून योग्य वेळी योग्य निर्णय' घेण्याचे तत्त्व शिकता येते.

थोडक्यात, भारताचा हा विजय भारताची प्रतिमा उंचावणारा आणि भारतीयांसाठी प्रेरणा देणारा ठरेल..!


~ सचिन विलास बोर्डे

21/5

T20 World Cup 2024 | India Vs South Africa | Team India | Cricket | Global Politics | International Relations | Sports

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!