Posts

Showing posts with the label JUN24

92. विकासाच्या वाटेवरील भारत!

सर्वप्रथम ' भारतीय क्रिकेट संघाचे ' अभिनंदन! काल झालेल्या ' टी-20 विश्वचषकाच्या ' अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. हा विजय भारतासाठी आणि भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारताने क्रीडा क्षेत्रात घडविलेल्या या सर्वोत्तम कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते. भारत क्रीडा क्षेत्रात पुरेसा विकास घडवीत आहे या दृष्टीने इतर देश भारताकडे पाहू लागतात. अलीकडच्या काळात ' क्रिकेट ' सारख्या मैदानी खेळांबरोबरच ' बुद्धिबळासारख्या ' बैठे खेळातही भारताने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली दिसते. या खेळांत सहभागी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करतात. विविध देश या खेळांत सहभागी होतात. परिणामी ' जागतिक राजकारणात ' विविध देशांशी ' आंतरराष्ट्रीय संबंध ' वाढीस लागण्यास हे खेळ उपयुक्त ठरतात. या स्पर्धात्मक खेळांना मनोरंजनापुरते सीमित न करता यातून अनेक बाबी आपण शिकायला हव्या. उदा, क्रिकेट मध्ये साधारणतः 11 खेळाडूंचा गट असतो. त्यांच्या सामूहिक प्रयत्नावरच त्या गटाचे यश-अप...

91. विकासाच्या वाटेवरील भारत!

" धूम्रपान " आरोग्यास हितकारक नाही... ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. तरीदेखील भारतात धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे हे दर्शविणारा ' इंडिया टोबॅको कंट्रोल रिपोर्ट/अहवाल ' केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रकाशित केला होता. अहवालानुसार, ' किशोरावस्थेतल्या (Adolescents) मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अत्याधिक आहे. ' 2009 ते 2019 या काळात मुलींमधल्या धूम्रपानाच्या प्रमाणात 3.8 टक्क्यांची वाढ होऊन हे प्रमाण 6.2 टक्क्यांवर पोहोचले. मुलांमधील धूम्रपानाच्या प्रमाणात 2.3 टक्क्यांची वाढ झाली. प्रौढ पुरुषांच्या धूम्रपानाच्या प्रमाणात 2.2 टक्क्यांची आणि स्त्रियांच्या प्रमाणात 0.4 टक्क्यांची घट झालीय. धूम्रपानाच्या जीवघेण्या व्यसनात तरुण पिढी (प्रामुख्याने तरुण मुली) अडकल्याचे वास्तव या अहवालातून अधोरेखित होते. किशोरावस्थेतील तरुण-तरुणी ' कूल अन् फॅशनेबल ' दिसण्याकरिता, ' टेन्शन ' पासून मुक्ती मिळविण्याकरिता तसेच इतरांच्या प्रभावाखाली येवून धूम्रपान करतात. मुलीने किंवा प्रौढ स्त्रीने धूम्रपान करणे म्हणजेच ' स्त्री सक्षमीकरणाचं ' प्रतीक असल्याचं चित्र निर्माण के...

90. विकासाच्या वाटेवरील भारत!

महाराष्ट्रात अन् देशात जून-जुलै दरम्यान बऱ्यापैकी पावसाच्या सरी बरसतात. जमीन पुरेशी भिजली की ' शेतकरी ' आपल्या शेत-पेरणीला सुरुवात करतात. सदरील लेखात सैद्धांतिक आणि वास्तविक अशा दोन मुद्द्यांच्या आधारे या " शेती व्यवस्थेचे " विश्लेषण करीत आहे. सैद्धांतिक विश्लेषण - शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच इतर साधनांची जुळवा-जुळव करण्यासाठी पुरेसा ' पैका ' (पैसा) आवश्यक असतो. सगळी साधनं अन् पाऊस मुबलक असला की शेती चांगली पिकते. शेतकऱ्यांस चांगले उत्पन्न होते. देशात मुबलक धान्यपुरवठा होतो परिणामी अन्न-धान्यांच्या किमती स्थिर राहतात. सर्वसामान्यांना या किमती परवडणाऱ्या असल्याने त्यांचा खान-पानावरील खर्च वाढून त्यांचे आरोग्य अन् जीवनस्तर उंचावतो. शेवटी हेच सक्षम ' अदृश्य हाथ ' अर्थव्यवस्थेस गती देऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात.  वास्तविक विश्लेषण - शेतकऱ्यांकडे शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या किमान पैशाचा कायम तुटवडा असतो. यामुळे ' सावकारी कर्जाच्या ' पर्यायातून पैशाची उभारणी ते करतात. नंतर शेती पिकविली जाते. पैशाअभावी उत्पन्न अन् धान्य...

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...