Posts

Showing posts with the label Global Politics

137. विकासाच्या वाटेवरील भारत!

22 एप्रिलला काश्मीरातील पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादाला प्रत्युत्तर देणे भारतासाठी आवश्यकच होते. परिणामी दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता भारताने 07 मे ला " Operation Sindoor " च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. हीच बाब तीन मुद्द्यांच्या साह्याने समजून घेऊया... पहिला मुद्दा, भारताच्या दहशतवादावरील या हल्ल्याचा अर्थ पाकिस्तानने स्वतःवरील हल्ला असा घेतला. अन् भारतावर प्रतिहल्ला करून युद्धास सुरुवात केली. दहशतवादाच्या प्रश्नावर भारत अन् पाकिस्तानने मिळून उत्तरे शोधणे अपेक्षित होते. मात्र दहशतवाद्यांना छातीशी कवटाळणाऱ्या पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणं अपेक्षाभंगच ठरला. दुसरा मुद्दा, ज्या उद्देशाने या लष्करी कारवायांची सुरुवात झाली होती तो उद्देश बाजूला होतोय. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शिरकाव झालेला दिसतोय. दोन्ही देशांना इतर देशांचा छुपा पाठिंबा असल्यास अन् बदल्याच्या भावनेच्या चक्रात हे युद्ध अडकल्यास या युद्धाला पूर्णविराम नसेल. जो देश दीर्घकाळ युद्धात गुंतलेला असतो त्या देशाच्या विकासात अडथळे निर्...

134. विकासाच्या वाटेवरील भारत!

अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आले. अन् ट्रम्प यांनी विविध धोरणे जाहीर करण्यास सुरुवात केली. यातील चर्चा करण्याजोगं धोरण म्हणजे " आयात शुल्काचं (Tariff/Import Duty) ". आयात शुल्क म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. स्थानिक, देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी आयात शुल्क आकारण्यात येतो. समजा अमेरिकेने आयात शुल्क वाढविले तर, अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंची किंमत वाढेल, या वस्तू महाग होतील परिणामी अमेरिकेतील ग्राहक देशी वस्तूंकडे वळतील. स्थानिक वस्तूंची मागणी, उत्पादन आणि विक्री वाढेल. बहुतांश देशांनी ' खुल्या अर्थव्यवस्थेचा ' स्वीकार केला असल्याने एखाद्या देशाच्या व्यापार करातील बदलांचा इतर देशांवरही परिणाम होतो. भांडवली बाजार, तेल बाजार, सोने बाजार यातही चढ-उतार होतात. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीचे चक्रही बघायला मिळते. आयात शुल्काच्या वाढीमुळे जागतिक व्यापारावर मर्यादा येऊ शकतात तसेच ' व्यापार युद्धे ' देखील आकारास येऊ शकतात. अमेरिकेने अलीकडेच विविध देशांकरिता विविध आयात शुल्क निश्चित केले आह...

92. विकासाच्या वाटेवरील भारत!

सर्वप्रथम ' भारतीय क्रिकेट संघाचे ' अभिनंदन! काल झालेल्या ' टी-20 विश्वचषकाच्या ' अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. हा विजय भारतासाठी आणि भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारताने क्रीडा क्षेत्रात घडविलेल्या या सर्वोत्तम कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते. भारत क्रीडा क्षेत्रात पुरेसा विकास घडवीत आहे या दृष्टीने इतर देश भारताकडे पाहू लागतात. अलीकडच्या काळात ' क्रिकेट ' सारख्या मैदानी खेळांबरोबरच ' बुद्धिबळासारख्या ' बैठे खेळातही भारताने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली दिसते. या खेळांत सहभागी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करतात. विविध देश या खेळांत सहभागी होतात. परिणामी ' जागतिक राजकारणात ' विविध देशांशी ' आंतरराष्ट्रीय संबंध ' वाढीस लागण्यास हे खेळ उपयुक्त ठरतात. या स्पर्धात्मक खेळांना मनोरंजनापुरते सीमित न करता यातून अनेक बाबी आपण शिकायला हव्या. उदा, क्रिकेट मध्ये साधारणतः 11 खेळाडूंचा गट असतो. त्यांच्या सामूहिक प्रयत्नावरच त्या गटाचे यश-अप...