Posts

Showing posts with the label International Relations

137. विकासाच्या वाटेवरील भारत!

22 एप्रिलला काश्मीरातील पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादाला प्रत्युत्तर देणे भारतासाठी आवश्यकच होते. परिणामी दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता भारताने 07 मे ला " Operation Sindoor " च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. हीच बाब तीन मुद्द्यांच्या साह्याने समजून घेऊया... पहिला मुद्दा, भारताच्या दहशतवादावरील या हल्ल्याचा अर्थ पाकिस्तानने स्वतःवरील हल्ला असा घेतला. अन् भारतावर प्रतिहल्ला करून युद्धास सुरुवात केली. दहशतवादाच्या प्रश्नावर भारत अन् पाकिस्तानने मिळून उत्तरे शोधणे अपेक्षित होते. मात्र दहशतवाद्यांना छातीशी कवटाळणाऱ्या पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणं अपेक्षाभंगच ठरला. दुसरा मुद्दा, ज्या उद्देशाने या लष्करी कारवायांची सुरुवात झाली होती तो उद्देश बाजूला होतोय. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शिरकाव झालेला दिसतोय. दोन्ही देशांना इतर देशांचा छुपा पाठिंबा असल्यास अन् बदल्याच्या भावनेच्या चक्रात हे युद्ध अडकल्यास या युद्धाला पूर्णविराम नसेल. जो देश दीर्घकाळ युद्धात गुंतलेला असतो त्या देशाच्या विकासात अडथळे निर्...

134. विकासाच्या वाटेवरील भारत!

अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आले. अन् ट्रम्प यांनी विविध धोरणे जाहीर करण्यास सुरुवात केली. यातील चर्चा करण्याजोगं धोरण म्हणजे " आयात शुल्काचं (Tariff/Import Duty) ". आयात शुल्क म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. स्थानिक, देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी आयात शुल्क आकारण्यात येतो. समजा अमेरिकेने आयात शुल्क वाढविले तर, अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंची किंमत वाढेल, या वस्तू महाग होतील परिणामी अमेरिकेतील ग्राहक देशी वस्तूंकडे वळतील. स्थानिक वस्तूंची मागणी, उत्पादन आणि विक्री वाढेल. बहुतांश देशांनी ' खुल्या अर्थव्यवस्थेचा ' स्वीकार केला असल्याने एखाद्या देशाच्या व्यापार करातील बदलांचा इतर देशांवरही परिणाम होतो. भांडवली बाजार, तेल बाजार, सोने बाजार यातही चढ-उतार होतात. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीचे चक्रही बघायला मिळते. आयात शुल्काच्या वाढीमुळे जागतिक व्यापारावर मर्यादा येऊ शकतात तसेच ' व्यापार युद्धे ' देखील आकारास येऊ शकतात. अमेरिकेने अलीकडेच विविध देशांकरिता विविध आयात शुल्क निश्चित केले आह...

102. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने स्त्रियांच्या स्वातंत्र्याला निर्बंध घालणारे काही कायदे केलेत. या " नैतिक कायद्यातील (Morality Law) " नियमांनुसार अफगाणी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकावे लागेल, मोठ्याने वाचण्यास अथवा गाणी म्हणण्यास मनाई, पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय स्त्रियांना एकटे घराच्या बाहेर पडण्यास तसेच नातेवाईक पुरुष सदस्य वगळता इतर पुरुषांना चेहरा दाखविण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदाचाराचा/नैतिकतेचा प्रसार करण्याकरिता हे कायदे लागू केल्याचा मुलामा तालिबानी सरकार देत असले तरी हे कायदे स्त्री विरोधीच ठरतात. या कायद्यामुळे तिथल्या प्रशासनाच्या अधिकरांत प्रंचड वाढ होईल. तसेच पुरुषी वर्चस्व देखील वाढेल. परिणामी तिथल्या स्त्रियांवर शासन-प्रशासनाचं आणि समाजातील पुरुषाचं असं ' दुहेरी वर्चस्व तथा दुहेरी दमन ' असेल. या कायद्याने स्त्रियांचा सार्वजनिक मुक्त अवकाशावर निर्बंध घातल्याने स्त्रिया शारीरिक, मानसिक आणि वैचारिकरित्या बंदिस्त होतील. आणि बंदिस्त असलेल्या स्त्रिया स्वतःचा विकास साध्य करण...

98. विकासाच्या वाटेवरील भारत!

कुठल्याही देशात ' विद्यार्थी ' हे त्या देशाची दिशा ठरविण्यात फार मोठी भूमिका बजावतात. देशाची धोरणे विद्यार्थ्यांच्या हिताची असल्यास देशाच्या विकासास हातभार लागतो अन् राज्यव्यवस्थेची धोरणेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधी असेल तर त्या ' राज्यव्यवस्थेची उलथापालथ ' होते. हाच निष्कर्ष आपल्या शेजारच्या " बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेतून " काढता येईल. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. त्यास हिंसक वळण लागले. संचारबंदीही आंदोलनास रोखू शकली नाही. शेवटी प्रधानमंत्रीने राजीनामा देत देश सोडला. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारतासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत. उदा. सीमा सुरक्षा, बांगलादेशातील भारतीयांची सुरक्षा, व्यापार. भारताशेजारील पाकिस्तान अथवा चीन या देशांच्या बांगलादेशातील कुरापतींबद्दल भारताला अधिक सावध/सजग/दक्ष राहावे लागणार आहे. यापूर्वी भारत-बांगलादेश संबंध सहकार्याचे राहिले आहे. मात्र आता बांगलादेशात सत्तास्थानी कोण असेल यावरून पुढील सहकार्याच...

92. विकासाच्या वाटेवरील भारत!

सर्वप्रथम ' भारतीय क्रिकेट संघाचे ' अभिनंदन! काल झालेल्या ' टी-20 विश्वचषकाच्या ' अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. हा विजय भारतासाठी आणि भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारताने क्रीडा क्षेत्रात घडविलेल्या या सर्वोत्तम कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते. भारत क्रीडा क्षेत्रात पुरेसा विकास घडवीत आहे या दृष्टीने इतर देश भारताकडे पाहू लागतात. अलीकडच्या काळात ' क्रिकेट ' सारख्या मैदानी खेळांबरोबरच ' बुद्धिबळासारख्या ' बैठे खेळातही भारताने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली दिसते. या खेळांत सहभागी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करतात. विविध देश या खेळांत सहभागी होतात. परिणामी ' जागतिक राजकारणात ' विविध देशांशी ' आंतरराष्ट्रीय संबंध ' वाढीस लागण्यास हे खेळ उपयुक्त ठरतात. या स्पर्धात्मक खेळांना मनोरंजनापुरते सीमित न करता यातून अनेक बाबी आपण शिकायला हव्या. उदा, क्रिकेट मध्ये साधारणतः 11 खेळाडूंचा गट असतो. त्यांच्या सामूहिक प्रयत्नावरच त्या गटाचे यश-अप...

86. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण ICMR ने जारी केलेले ' खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे ' जाणून घेतली. ज्यातून आपल्याला पोषक आहारासाठी आवश्यक बाबी समजल्या.  जसं आहारातील अन्न-घटकात पोषक तत्वे महत्वाची, तसचं कुठल्याही अन्न-घटकात चव अन् स्वादिष्टपणा देखील महत्वाचा. याकरिताच अन्न पदार्थांत विविध " मसाल्यांचा " उपयोग केला जातो. देशात प्रामुख्याने लवंग, इलायची, मिरच्या, लसूण, आले, हळद, जिरे, कोथिंबीर इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. विविध व्यापारी कंपन्या या मसाल्यांची देशांतर्गत आणि इतर देशांत विक्री करतात. अलीकडेच सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांनी भारतीय मसाल्यांतील घातकपणा उघडकीस आणला. भारतीय मसाले उत्पादकांनी मसाले जास्त काळ टिकण्याकरिता ' इथिलिन ऑक्साईडचा ' मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्याचे यातून समोर आले. " कॉर्सिनोजेन रसायने अथवा इथिलिन ऑक्साईडमुळे कर्करोग होतो. परिणामी हे मसाले जीवघेणे ठरू शकतात. " ही बाब इतर देशांकडून आपल्याला समजली. यातून आपल्या देशातील भारतीय मसाले मंडळ, केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FD...