Posts

Showing posts with the label COVID-19

84. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताने कोविड-19 ला आटोक्यात आणण्याकरिता प्रामुख्याने ' Covishield ' आणि ' Covaxin ' या लसींना मान्यता दिली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात भारताला यश मिळाले. कोव्हिशिल्ड बनविणारी ' ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) ' या ब्रिटन मधील औषध कंपनीने नुकतीच एक कबुली दिल्याने अनेकांच्या मनात संशय अन् भीती निर्माण झालीय. भारतात कोव्हिशिल्डची निर्मिती पुण्यातील ' सीरम इन्स्टिट्यूटने ' केली होती. आणि तिच्या 175 कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या. ॲस्ट्राझेनेकाच्या मते कोव्हिशिल्ड लशीमुळे काही दुर्मिळ रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स / Platelet कमी होणे ( Thrombocytopenia Syndrome -TTS ) आणि रक्तात गुठळ्या / Blood Clots तयार होणे ( Thrombosis ) या बाबी दिसून येऊ शकतात. चार वर्षानंतर उलगडा झालेला हा ' दुर्मिळ दुष्परिणाम ' दुर्लक्षित करण्याइतका निश्चितच नाही. हा दुर्मिळ दुष्परिणामच नागरिकांचा शासनावरील, प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरील विश्वास कमी करण्यास पुरेसा ठरतो. भारतात ' सार्वजनिक आरोग्य ' हा जरी राज्याच्या अखत्यारीतला व...

58. विकासाच्या वाटेवरील भारत!

COVID-19 च्या लसीकरणामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेेय का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कोविड-19 ची लागण असलेल्या 18 ते 45 वयोगटातील निरोगी तरुणांचा आकस्मिकपणे 'हृदयविकाराच्या झटक्याने ' मृत्यू होत आहे. होणारे मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे होत आहे की नाही, हे तपासणारा अभ्यास " भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद " (The Indian Council of Medical Research) ने केलाय. संशोधनानुसार -  झालेले आकस्मिक मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे झालेले नाहीत. याउलट लसीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. हे ठळकपणे ICMR ने नोंदवले आहे.  कोविडची तीव्र (Severe) लागण, धूम्रपान, मद्यपान (Binge Drinking), अतिव्यायाम/शारीरिक श्रम (Intense Physical Activity) या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ICMR ने नमूद केले आहे. दक्षतेबाबत - ज्यांना पूर्वी गंभीर कोविड संसर्ग झालाय त्यांनी एक ते दोन वर्षे जास्त शारीरिक श्रमासह कोणतेही काम करू नये. हा केंद्रीय आरोग्य मंत्रीने दिलेला सल्ला लक्षात घेऊन धूम्रपान, मद्यपान, अतिव्यायाम आपण टाळायला हवा..! ~ सचिन विलास बोर्डे 14/1 The Indian Council of Medical Resea...