Posts

Showing posts with the label MAY24

87. विकासाच्या वाटेवरील भारत!

पुण्याच्या कल्याणीनगर भागातील " पोर्श अपघात प्रकरणाची " बातमी मनाला सुन्न करणारी होती. विविध वृत्तवाहिन्यांवर, समाज माध्यमांवर या प्रकरणाचे वृत्त प्रसारित केले गेले. 'त्या' आरोपीस अगदी 'बालिश शिक्षा' सुनावल्याने या प्रसारास वेग मिळाला. अपघातानंतर त्याने 300 शब्दाचा निबंध लिहावा. त्याने 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसह वाहतूक पोलिसांना मदत करावी. मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेऊन त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयास सादर करावा. या अटी-शर्तींवर आरोपीस ' बाल न्याय मंडळाने ' जामीन मंजूर केली होती. यामुळेच नागरिकांनी विविध माध्यमातून संताप व्यक्त केला. कुठल्याही गुन्हेगारांस ' शिक्षा देण्यामागे प्रामुख्याने दोन हेतू ' असतात. पहिला हेतू म्हणजे दिलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांच्या आचरणात बदल व्हावा. अन् दुसरा हेतू म्हणजेच सतत त्याच-त्याच गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबविणे. पोर्श प्रकरणात पहिल्या हेतुवरच अधिकचा भर दिला. दुसरा हेतू दुर्लक्षित झाल्याने त्याचे पडसाद नागरिकांच्या संतापातून व्यक्त झाले. 'पैसे दिल्यावर गुन्ह्यातून सुटका लवकर होते, आमच्याकडुन अपघात झ...

86. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण ICMR ने जारी केलेले ' खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे ' जाणून घेतली. ज्यातून आपल्याला पोषक आहारासाठी आवश्यक बाबी समजल्या.  जसं आहारातील अन्न-घटकात पोषक तत्वे महत्वाची, तसचं कुठल्याही अन्न-घटकात चव अन् स्वादिष्टपणा देखील महत्वाचा. याकरिताच अन्न पदार्थांत विविध " मसाल्यांचा " उपयोग केला जातो. देशात प्रामुख्याने लवंग, इलायची, मिरच्या, लसूण, आले, हळद, जिरे, कोथिंबीर इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. विविध व्यापारी कंपन्या या मसाल्यांची देशांतर्गत आणि इतर देशांत विक्री करतात. अलीकडेच सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांनी भारतीय मसाल्यांतील घातकपणा उघडकीस आणला. भारतीय मसाले उत्पादकांनी मसाले जास्त काळ टिकण्याकरिता ' इथिलिन ऑक्साईडचा ' मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्याचे यातून समोर आले. " कॉर्सिनोजेन रसायने अथवा इथिलिन ऑक्साईडमुळे कर्करोग होतो. परिणामी हे मसाले जीवघेणे ठरू शकतात. " ही बाब इतर देशांकडून आपल्याला समजली. यातून आपल्या देशातील भारतीय मसाले मंडळ, केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FD...

85. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (The Indian Council of Medical Research) ने " खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे " जारी केले आहेत. या लेखात ही तत्वे तपशीलवार जाणून घेऊयात. तत्पूर्वी ICMR ने अधोरेखित केलेले काही महत्वपूर्ण मुद्दे देखील नमूद करतो. ICMR - The National Institute of Nutrition च्या मते, देशातील 56.4 टक्के आजारांचं कारण चुकीचा किंवा असमतोल आहार आहे. योग्य आहार आणि व्यायामामुळे Coronary Heart Disease (CHD) आणि Hypertension (HTN) ला लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकते तसेच Type 2 Diabetes  80% टक्क्यांपर्यंत टाळता येऊ शकतो. महत्वाची मार्गदर्शक तत्वे - 1. संतुलित आहारासाठी विविध प्रकारचे पदार्थ खावे.  2. गरोदर स्त्रिया आणि नवीन मातांना जास्तीचा आहार आणि आरोग्यसेवा मिळायला हव्या.  3. बाळाला पहिल्या सहा महिन्यांसाठी स्तनपान करा; दोन वर्षांपर्यंत आणि त्यापुढील काळातही स्तनपान चालू ठेवा. 4. सहा महिने वयानंतर, बाळाला घरगुती अर्ध-घन पूरक आहार (Semi-solid Complementary Foods) द्यावा. 5. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. 6. तेल कमी प्रमाणात वापरा. 7. आहारात चांगली प्रथिने आणि ...

84. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताने कोविड-19 ला आटोक्यात आणण्याकरिता प्रामुख्याने ' Covishield ' आणि ' Covaxin ' या लसींना मान्यता दिली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात भारताला यश मिळाले. कोव्हिशिल्ड बनविणारी ' ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) ' या ब्रिटन मधील औषध कंपनीने नुकतीच एक कबुली दिल्याने अनेकांच्या मनात संशय अन् भीती निर्माण झालीय. भारतात कोव्हिशिल्डची निर्मिती पुण्यातील ' सीरम इन्स्टिट्यूटने ' केली होती. आणि तिच्या 175 कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या. ॲस्ट्राझेनेकाच्या मते कोव्हिशिल्ड लशीमुळे काही दुर्मिळ रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स / Platelet कमी होणे ( Thrombocytopenia Syndrome -TTS ) आणि रक्तात गुठळ्या / Blood Clots तयार होणे ( Thrombosis ) या बाबी दिसून येऊ शकतात. चार वर्षानंतर उलगडा झालेला हा ' दुर्मिळ दुष्परिणाम ' दुर्लक्षित करण्याइतका निश्चितच नाही. हा दुर्मिळ दुष्परिणामच नागरिकांचा शासनावरील, प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरील विश्वास कमी करण्यास पुरेसा ठरतो. भारतात ' सार्वजनिक आरोग्य ' हा जरी राज्याच्या अखत्यारीतला व...