73. विकासाच्या वाटेवरील भारत!
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार हा सुदृढ लोकशाहीचा गाभा आहे. आधुनिक युगात आपली मते/विचार मांडण्यासाठी 'सोशल मीडिया' सर्वोत्तम साधन ठरतेय.
देशातील बहुसंख्य नागरिक सोशल मीडियाच्या विभिन्न प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Instagram, Facebook, X (Twitter) ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली माध्यमे आहेत.
दोन आयामांच्या आधारे या विश्लेषणाची मांडणी करूया.
पहिल्या आयामानुसार या माध्यमांवर वापरकर्ते आपली मते, विचार, माहिती, जीवन-शैली इतरांशी शेअर करतात. थोडक्यात पहिला आयाम माध्यमांची सकारात्मकता दर्शवितो.
याच्या अगदी विपरीत दुसरा आयाम. याच समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते. दुसरा आयाम माध्यमांची नकारात्मकता उघडकीस आणतो.
इंस्टा, फेसबुक अथवा यूट्यूब वरील 'Reels/Shorts' यावर भारतीय जनतेचा/तरुणांचा भला-मोठ्ठा वेळ व्यतीत होत आहे.
या 'मानसिक व्यसनातून' आपण तातडीने सुटका करायला हवी. सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापराकडे आपण लक्ष पुरवायला हवे. अन्यथा 'बौद्धिक विकास कुंठित झालेला समाज अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतो' हेही तितकेच खरे...
इंटरनेट वर आपले मत व्यक्त करणे हा जरी मूलभूत हक्क असला, तरी त्यावर सभ्यता अथवा नैतिकतेच्या आधारे निर्बंध घालता येतात. या बाबी लक्षात ठेवूनच तरुणांनी आपल्या हक्कांचा उपभोग घेणे अतिमहत्वाचे. अन्यथा आपणच आपली आणि आपल्या देशाची प्रतिमा मलिन करणारे नागरिक ठरू.
उपरोल्लेखित दुसऱ्या आयामाचे तत्काळ नियमन करणे अत्यंत गरजचे आहे. अन्यथा यातून निष्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांना येणाऱ्या काळात आळा घालणे अशक्यप्राय ठरेल..!
~ सचिन विलास बोर्डे
17/3
Social Media | Democracy | Article 19 (1) (a) | Fundamental Right | Youths | Freedom Of Speech And Expression
Comments
Post a Comment