Posts

Showing posts with the label Social Media

114. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या संसदेने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले. " The Online Safety Amendment (Social Media Minimum Age) Bill 2024 " नामक या विधेयकानुसार X, TikTok, Snapchat, Facebook आणि Instagram इत्यादी सारख्या प्लॅटफॉर्म वर मुलांना खाती ठेवण्यापासून बंदी करण्यात येणार आहे. तसेच या कंपन्या या विधेयकातील तरतुदींच्या अंमलबजावणीत अयशस्वी ठरल्यास त्यांना 32 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.  सोशल मीडियाचा लहान मुलांवर होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता उपरोक्त कायदा तर्कसंगत वाटतो. भारतासंदर्भातही सोशल मीडियाचे नियमन करणारा कायदा असावा का? या प्रश्नावर अनेक मतमतांतरे बघायला मिळतात. मात्र सध्याची वास्तविक परिस्थिती लक्षात घेता अनेक मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात. समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते. लहान मुलांत पुरेशी समज नसल्याने तेही यात अडकत ज...

110. विकासाच्या वाटेवरील भारत!

एकीकडे मानवाने मानवी विवेक विकसित करून तंत्रज्ञानाच्या विकासाला गतिमान केले. सोबतच या 'डिजिटल युगातील डिजिटल मानवाने' तंत्रज्ञानाच्या विकासातून मानवी विकास साध्य करण्याकरिता नवनवीन कल्पनांचा आविष्कार केला. दुसरीकडे काहींनी या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची अन् गुन्हेगारीची सांगड घालून " सायबर गुन्हेगारी " या संकल्पनेचा आविष्कार केला. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्हेगारीही विकसित होत गेली. याच सायबर गुन्हेगारीचं विकसित झालेलं अलीकडील रूप म्हणजे " डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) ." डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? - या ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या प्रकारात गुन्हेगार साधा किंवा व्हिडिओ कॉल करतात. हे गुन्हेगार खोटी कागदपत्रे दाखवून पोलिस, सीबीआय, ईडी या विभागातील अधिकारी असल्याचे सांगतात. विविध आरोप करून अटक करण्याची भीती दाखवतात. अटकेतून सुटण्याकरिता ठराविक रक्कम जमा करण्याची मागणी केली जाते. ज्यांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसते ते अशा बनावट प्रकरणांना बळी पडतात. खबरदारी कशी घ्याल? - कुठल्याच गुन्ह्याकरिता डिजिटल अरेस्ट ची तरतूद केलेली नाही. ही बाब लक्षात घ्या...

73. विकासाच्या वाटेवरील भारत!

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार हा सुदृढ लोकशाहीचा गाभा आहे. आधुनिक युगात आपली मते/विचार मांडण्यासाठी ' सोशल मीडिया ' सर्वोत्तम साधन ठरतेय. देशातील बहुसंख्य नागरिक सोशल मीडियाच्या विभिन्न प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Instagram, Facebook, X (Twitter) ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली माध्यमे आहेत. दोन आयामांच्या आधारे या विश्लेषणाची मांडणी करूया. पहिल्या आयामानुसार या माध्यमांवर वापरकर्ते आपली मते, विचार, माहिती, जीवन-शैली इतरांशी शेअर करतात. थोडक्यात पहिला आयाम माध्यमांची सकारात्मकता दर्शवितो.  याच्या अगदी विपरीत दुसरा आयाम. याच समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते. दुसरा आयाम माध्यमांची नकारात्मकता उघडकीस आणतो. इंस्टा, फेसबुक अथवा यूट्यूब वरील ' Reels/Shorts ' यावर भारतीय जनतेचा/तरुणांचा भला-मोठ्ठा वेळ व्यतीत होत आहे.  या ' मानसिक व्यसनातून ' आपण तातडीने सुटका करायला हवी. सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापरा...

59. विकासाच्या वाटेवरील भारत!

शाळेत शिकलेला 'अश्मयुगीन मानव' आपणास आठवत असेल. जो कंद-मुळे खायचा, दगडाची हत्यारे/साधने वापरायचा. अगदी साधे जीवन जगायचा. हळूहळू त्याच्या बुद्धीत विचारांनी जन्म घेतला. मानवी विवेकाच्या कक्षा रुंदावल्या अन् तंत्रज्ञानाच्या विकासाने गती पकडली. आज या मानवाचे स्वरूप बदललेय. 'हा डिजिटल मानव डिजिटल युगात जगायला लागला.' ऑक्सिजन इतकं महत्व इंटरनेटला मिळालं. काळानुरूप हे तंत्रज्ञान (Technology) अधिकच विकसित होत आहे. यातीलच एक विकसनशील प्रकार म्हणजेच " Artificial Intelligence (AI) ." थोडक्यात मानवाने निर्माण केलेला हा 'यांत्रिक मेंदूच'..! Robotics, Marketing, Gaming, Education, Health Care, National Security, Cyber Security ई. क्षेत्रात AI ने अनेक उल्लेखनीय कामे पार पाडली आहेत. नैतिकतेचा अभाव, बेरोजगारीत वाढ, पक्षपात (Bias) या AI तील त्रुटीही तितक्याच खऱ्या. AI चा तथा Deepfake चा उपयोग करून फोटो किंवा व्हिडिओ चे Morphing अथवा Editing केल्या जाते. थोडक्यात, महिलांच्या फोटो तथा व्हिडिओला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हर्च्युअली विवस्त्र केल्या जातं. प्रसिद्ध...

4. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्लीच्या तरुणाला लागलंय ते सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांच व्यसन.. हा तरुण माध्यमांचा हवा तसा वापर करून घेण्यात कुठलीही कसर सोडीत नाही. अन् त्यातून जन्माला येते सायबर गुन्हेगारी... (उदा. Identity Theft, Financial Fraud, Cyberbullying, Harrasment, Morphing, Child Pornography, Drugs, Phishing)  समाजमाध्यमे ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व क्रांतीच होय. त्यांचा वापर उन्नत, ज्ञानसंपन्न समाज घडविण्यासाठी, माणसामाणसांतील दुरी बुजवण्यासाठी करण्याऐवजी आजकाल लोकांमध्ये दुरावा, द्वेष, अफवा, बदनामी आदी हेतूंसाठीच जास्त होताना दिसतो. यावर आळा घालण्यासाठी सरकारी आस्थापना कायम प्रयत्नशील असतात. शिक्षित या नात्याने आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची नोंद करणे सजाण भारतीय नागरिकाचे वैशिष्टे असावे. सोशल मीडियाच्या व्यसनाचे रूपांतर साक्षरतेच्या व्यसनात करणे ही तरुणाची भूमिका असायला हवी..! ~ सचिन विलास बोर्डे 1/4 Cyber Crime | Social Media | Youths  NEXT 🔹 PREVIOUS