68. विकासाच्या वाटेवरील भारत!
सदरील लेखात कुठल्याही समूहाच्या धार्मिक भावनांची निंदा करण्याचा उद्देश नाही. हा लेख "धर्म आणि राजकारण" याविषयीचे चिकित्सक आकलन मांडण्याकरिता सादर करीत आहे.
जातींचा अथवा धर्माचा आधार घेत राजकारण करणे, सत्ता टिकविणे या बाबी नव्या नाहीत. भारत पारतंत्र्यात असताना देखील 'बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्याक' असे चित्र राज्यकर्त्यांद्वारे निर्माण करण्यात आले होते. या आधारावरच सत्ता टिकवून ठेवली गेली.
काही काळानंतर एकीकडे देशाची फाळणी अन् दुसरीकडे देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळालेल्या देशात पुन्हा नव्याने बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्याक असे चित्र रंगविले जाऊ नये, जाती-धर्माच्या आधारावर राजकारण होऊ नये याकरिता घटनाकारांनी विविध तरतुदी केल्या. जसे, धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल, राज्यसंस्थेचा कुठलाही एक धर्म नसेल, राज्यसंस्था सर्वच धर्मांना समान वागणूक देईल.
मात्र आजच्या राज्यसंस्थेची भूमिका अन् संविधानातील तरतुदी यांचा काही ताळमेळ बसेना...
धर्म हा श्रद्धेपुरता मर्यादित राहिलेला नसून राजकीय पक्ष त्याच्या उपयोगाने सत्ता टिकवून ठेवत आहे. समाजव्यवस्था देखील जातींविषयी, धर्मांविषयी अत्यंत संवेदनशील आहे. परिणामी 'निवडणुका जवळ आल्या की, राजकीय पक्ष धार्मिकतेच्या रथावर स्वार होऊन आपला प्रचार-प्रसार करतात.' जनतेला देखील ते आपल्या जातीचे वाटतात. देश हितापेक्षा जाती-धर्माला महत्व देऊन आपण आपलाच विकास कुंठित करत आहोत.
खरा अन् अस्सल धर्म मानवता, नैतिकता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, अहिंसा, सत्य ही तत्वे शिकवितो.
हिंसा/दंगली करणे, इतर धर्मीयांचा द्वेष करणे, मंदिर-मस्जिद-चर्च-विहार-गुरुद्वारा तोडणे हे धर्म शिकवीत नाही. या बाबी धर्मावर आधारित राजकारण शिकविते हे आपण लक्षात घेणे अतिमहत्वाचे..!
~ सचिन विलास बोर्डे
16/2
Communalism | Secularism | Political Parties | Communal Politics
Comments
Post a Comment