24. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारतीय संविधानातील दुसरा मूलभूत हक्क म्हणजेच 'स्वातंत्र्याचा अधिकार (Right To Freedom)'. कलम 19 ते 22 मध्ये याविषयी सविस्तर विश्लेषण नमूद आहे.
जागेअभावी कलम 19 चे विस्तृत विश्लेषण करणे शक्य नसल्याकारणाने थोडक्यात प्रस्तुत करीत आहे.
'कलम 19 भाषण स्वातंत्र्यासह काही हक्कांचे संरक्षण करते.'
कलम 19 (1) नुसार नागरिकांना पुढील हक्क अधोरेखित केले आहेत तसेच या हक्कांवर काही मर्यादा देखील घातल्या आहेत. -
A. भाषण(Speech) व अभिव्यक्ती(Expression) यांचे स्वातंत्र्य.
विविध न्यायालयीन निकालांव्दारे या हक्कांची व्यापकता वाढत गेलेली दिसते. उदा. इंटरनेट वर आपले मत व्यक्त करणे, निदर्शने करणे, व्यावसायिक जाहिराती करणे, वृत्तपत्र तथा मुद्रण करणे इत्यादी कालसुसंगत हक्क प्राप्त झाले आहेत.
B. शांततेने(Peaceably) व विनाशस्त्र(Without Arms) एकत्र जमणे.
सार्वजनिक सभा, निदर्शने आणि मोर्चा आयोजित करण्याचा हक्क यात अंतर्भूत होतो.
मर्यादा - देशाची सार्वभौमता आणि एकात्मता तसेच सार्वजानिक सुव्यवस्था याआधारे स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येतात.
C. संस्था(Associations) वा संघ(Unions) किंवा सहकारी संस्था(Co-operative Societies) स्थापन करणे.
यानुसार नागरिक संघटना स्थापन करू शकता तथा एखाद्या संघटनेचे सदस्यत्व नाकारू शकतात.
राजकीय पक्ष, संघटना, कामगार-शेतकरी संघटना, आस्थापना इत्यादी उदाहरणे देता येतील.
'मर्यादा' - भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, सार्वजानिक सुव्यवस्था व नीतिमत्ता/नैतिकता याआधारे निर्बंध लादता येतात.
(क्रमशः)
~ सचिन विलास बोर्डे
6/2
Article 19A | Article 19B | Article 19C | Right To Freedom
Comments
Post a Comment