6. विकासाच्या वाटेवरील भारत!
स्त्रीजीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक म्हणजेच मासिक पाळी!
खरेतर मासिक पाळी हा शब्द उच्चारणे लज्जास्पद नव्हे. हा एक साधा शरीरधर्म आहे. ह्या नैसर्गिक चक्राला आपण अंधश्रध्देचा आणि अपवित्रतेचा आयाम जोडलाय. मुळात हीच लाजिरवाणी बाब होय...
महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे आपण, अशा गोष्टी आल्या की मात्र गप्प.
मासिक पाळी दरम्यानच्या दिवसांत स्त्रियांना शारीरिक तथा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अलिखित सामाजिक बंदी असल्याने याविषयी चर्चा होत नाही.
'राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार' भारतातील 64 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, 50 टक्के महिला कापडाचा वापर करतात.
यात पुन्हा ग्रामीण आणि शहरी भागात तफावत दिसते. ग्रामीण क्षेत्रातील किशोरवयीन तरुणी आणि स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान वापरायची योग्य त्या साधनांची उपलब्धता / माहिती नसते. ज्यातून विवध आजारांना सामोरे जावे लागते...
(उदा. Reproductive Tract Infections, Bacterial Vaginosis, Urinary Tract Infections, Pelvic Infections, Cervical Cancer)
भारतातील सुमारे 23 दशलक्ष मुली मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) सुविधांच्या आणि शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे दरवर्षी शाळा सोडतात.
विविध सरकारी संस्था तथा समाज घटक याबद्दल जनजागृती करत असतात. जसे 'प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने' अंतर्गत देशभरातील केंद्रांमध्ये किमान 1 रुपये प्रति पॅड या दराने सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जातात.
मासिक पाळी हा विषय कुजबूजीपुरता मर्यादित न ठेवता त्याबद्दल खुलेपणाने चर्चा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची नितांत गरज आहे.
'महिलेचा विकास अर्थात समाजाचा विकास अन् समाजाचा विकास म्हणजे एकंदरीतच देशाचा विकास!'
~ सचिन विलास बोर्डे
2/1
Menstruation | Menstrual Cycle | Women Empowerment
Comments
Post a Comment