5. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारताच्या विकासाच्या वाटचालीत उपासमार अथवा भुकेचा प्रश्न आणखी तीव्र होतांना दिसत आहे.
नुकतेच जाहीर झालेला जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये 121 देशांमध्ये भारत 107व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (81), बांगलादेश (84), पाकिस्तान (99) आणि श्रीलंका (64) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचं यातून विशद होतं..
कोविडमुळे ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक झालेली दिसते.
पुढच्या पिढीला योग्य पोषण मिळाले, तरच त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होतो.तीव्र कुपोषित बालकांमध्ये विविध आजारांनी बालमृत्यू होण्याचे प्रमाण नऊ पटींनी वाढते.
विविध सरकारी सामाजिक आस्थापना देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी मोठी पाऊले उचलतात. 'एक देश, एक रेशन' तथा इतर काही धोरणांची योग्यरीत्या अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरते.
परिस्थिती स्वीकारून त्यावर सकारात्मक पद्धतीने प्रभावी उपाययोजना करणे अशी या संस्थेंची आणि सजाण नागरिक म्हणून आपली वैशिष्ट्ये असली पाहिजे...
~ सचिन विलास बोर्डे
1/5
Hunger | GHI | Malnutrition
Comments
Post a Comment